AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 च्या पहिल्या पर्वात कोणी जिंकले किती सामने? पाहा एका क्लिकवर

बहुचर्चित इंडियन प्रिमीयर लीग अर्थात IPL काही दिवसांत सुरु होणार आहे. पहिल्या पर्वात काही अप्रतिम सामने आपण पाहिले. आता दुसऱ्या पर्वातही अशाच सामन्यांची अपेक्षा क्रिकेटप्रेमी करत आहेत.

IPL 2021 च्या पहिल्या पर्वात कोणी जिंकले किती सामने? पाहा एका क्लिकवर
आयपीएल
| Edited By: | Updated on: Sep 13, 2021 | 6:46 PM
Share

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) यंदाचे 14 वे पर्व कोरोनाच्या संकटामुळे मध्येच थांबवण्यात आले होते. आता आय़पीएलला (IPL-2021)  युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. तर दुसऱ्या पर्वाला सुरुवात होण्याआधी पहिल्या पर्वात कोणत्या संघाचा दबदबा अधिक होता? आणि कोणता संघ कामगिरी करण्यात अयशस्वी राहिला यावर एक नजर फिरवूया…

तर पहिल्या पर्वात दिल्‍ली कॅपिटल्‍स आणि पंजाब किंग्‍सने 8-8 सामने खेळले असून इतर संघानी 7-7 सामने खेळले आहेत. यामध्ये दिल्‍ली कॅपिटल्‍सचा (Delhi Capitals) संघ सर्वात यशस्वी असून त्यांनी 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. त्यानंतर चेन्‍नई सुपरकिंग्‍सला (Chennai Superkings) महेंद्र सिंह धोनीने 7 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले आहेत.

कोहलीच्या आरसीबीसाठी यंदाची आयपीएल उत्तम

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत एकही आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये विराटचा संघ रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) उत्तम प्रदर्शन करत आहे. त्यांनी उत्तम सुरुवात करत 7 पैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहे. त्याशिवाय भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माची मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यंदा 7 पैकी 4 सामने जिंकली आहे.

हैद्राबाद संघाची परिस्थिती सर्वात खराब

संजू सॅमसन कर्णधार असलेली राजस्‍थान रॉयल्‍स (Rajasthan Royals) यंदा 7 पैकी 3 सामने जिंकली आहे.  तर पंजाब किंग्‍स (Punjab Kings) 8 सामन्यांपैकी 3 सामन्यात विजय मिळवू शकली आहे. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) केवळ दोनच सामने जिंकली आहे. पण या सर्वात सर्वात खराब परिस्थिती हैद्राबाद संघाची असून त्यांनी सात पैकी केवळ एकच सामना जिंकला आहे.

हे ही वाचा-

विराट कोहली नेमकं कोणत्या फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडणार?

IPL 2021: सलामीला येत ‘हे’ धुरंदर उधळतात जलवा, पाहा कोण आहेत हे दिग्गज!

T20 world Cup 2021: शिखरच्या गैरहजेरीत रोहित बरोबर सलामीला कोण?, विराट नाही तर ‘या’ खेळाडूवर जबाबदारी

(In IPL 2021 till now which team won how many matches know on one click)

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.