AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDvsAUS | बीसीसीआयचा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेबाबत मोठा निर्णय

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने नागपूरमधील पहिला सामना जिंकून सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

INDvsAUS | बीसीसीआयचा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेबाबत मोठा निर्णय
| Updated on: Feb 11, 2023 | 4:49 PM
Share

मुंबई : बीसीसीआयने बॉर्डर गावसकर ट्रॉफीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना हा हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा इथे आयोजित करण्यात आला आहे. हा सामना 1 ते 5 मार्च दरम्यान खेळवण्यात येणार आहे. मात्र आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने या सामन्याचं ठिकाण बदलण्याचं निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा सामना आता धर्मशाळा इथे होणार नसल्याचं माहिती मिळत आहे.

तिसरा सामन्याचं आयोजन कुठे?

इनसाइड स्पोर्ट्सनुसार, उभयसंघातील तिसरा सामना हा धर्मशाळाऐवजी मोहालीत खेळवण्यात येणार आहे. धर्मशाळेतील स्टेडियममध्ये नुकतंच दुरस्तीचं काम करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर या स्टेडियममध्ये सामन्याचं आयोजन करणं यशस्वी झालं नाही. या मैदानात अखेरचा कसोटी सामना हा टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 2017 साली खेळवण्यात आला होता. बीसीसाआयमधील तज्ज्ञांनी मैदानाची पाहणी केली. त्यानंतर सामन्याचं ठिकाण बदलण्याचं निर्णय घेण्यात आला.

बीसीसीआय अधिकारी काय म्हणाला?

“दुर्देवाने या सामन्याचं ठिकाण बदलावं लागत आहे. सामन्याच्या आदल्या दिवसापर्यंत इथे सर्व तयारी होणार नाही. सद्यस्थितीत इथे सामना होऊ शकत नाही”, अशी माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सला दिली.

टीम इंडिया मालिकेत आघाडीवर

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा नागपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीत शानदार विजय मिळवला. भारताने या विजयासह 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या पहिल्या सामन्यात ऑलराउंडर रवींद्र जडेजाने उल्लेखनी कामगिरी केली.

जडेजाने जडेजाने बॉलिंग करताना पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 2 अशा एकूण 7 विकेट्स घेतल्या. तर पहिल्या डावात बॅटिंग करताना 185 बॉलमध्ये 9 चौकारांच्या मदतीने 70 धावांची खेळी केली. जडेजाने केलेल्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ या पु्रस्काराने गौरवण्यात आलं.

दरम्यान या मालिकेतील दुसरा सामना हा दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये 17 ते 21 फेब्रुवारीदरम्यान खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.

Follow Us
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.