AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Ban : पहिल्या टेस्ट सामन्याआधी भारतीय संघाला धक्का, हे खेळाडू बाहेर

भारतीय संघाने वनडे सामना गमवल्यानंतर आता टेस्ट सीरीज जिंकण्याचं मोठं आव्हान संघापुढे असणार आहे.

Ind vs Ban : पहिल्या टेस्ट सामन्याआधी भारतीय संघाला धक्का, हे खेळाडू बाहेर
shailesh musale
shailesh musale | Updated on: Dec 11, 2022 | 9:30 PM
Share

Ind vs Ban 1st Test : वनडे सामना गमवल्यानंतर आता भारतीय संघाला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिका खेळायची आहे. पण त्याआधीच संघाचं टेन्शन वाढलं आहे. कारण संघाचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी केएल राहुलला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.तर चेतेश्वर पुजारा संघाचा उपकर्णधार असेल. रोहितला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अंगठ्याला दुखापत झाली होती . त्यामुळेच तो तिसऱ्या वनडे सामन्यात ही खेळू शकला नव्हता. उपचारासाठी तो मुंबईला रवाना झाला. मालिकेतील पहिला सामना 14 ते 18 डिसेंबर आणि दुसरा सामना 22 ते 26 डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे.

बीसीसीआयने एक निवेदन जारी करून सांगितले की, तज्ज्ञांनी रोहितला विश्रांतीचा सल्ला दिल्याने तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. तर दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल. वरिष्ठ निवड समितीने पहिल्या कसोटीसाठी त्याच्या जागी अभिमन्यू ईश्वरनचा समावेश केला आहे.

केवळ रोहितच नाही तर भारताचे आणखी दोन दिग्गज खेळाडूही बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका खेळणार नाहीत.मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरलेले नाहीत आणि त्यामुळेच ते सध्याच्या कसोटी मालिकेत खेळू शकणार नाहीत. “वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा अद्याप त्यांच्या खांद्याच्या आणि गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरे झाले नाहीत आणि ते कसोटी मालिकेतून बाहेर पडले आहेत,” असे बीसीसीआयने म्हटले आहे.

या दोघांच्या जागी नवदीप सैनी आणि सौरभ कुमार यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने सांगितले की, “निवडकर्त्यांनी शमी आणि जडेजाच्या जागी नवदीप सैनी आणि सौरभ कुमार यांचा संघात समावेश केला आहे. निवड समितीने जयदेव उनडकटचाही कसोटी मालिकेसाठी संघात समावेश केला आहे.

भारतीय संघ

केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू इसवरन, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनडकट.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल