IND vs ENG T20 WC : स्मृती मांधनाचा झुंजार खेळ, जिंकलेली मॅच टीम इंडिया कशी हरली?, ‘या’ 5 चुका महाग पडल्या

IND vs ENG T20 WC : टीम इंडियाचा या वर्ल्ड कपमधील हा पहिला पराभव आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयाची हॅट्रिक करेल, असं सर्वांना वाटलं होतं. पण हे काम इंग्लंडच्या टीमने केलं.

IND vs ENG T20 WC : स्मृती मांधनाचा झुंजार खेळ, जिंकलेली मॅच टीम इंडिया कशी हरली?, 'या' 5 चुका महाग पडल्या
Smirti mandhana
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 8:23 AM

IND vs ENG T20 WC : भारताच्या महिला टीमने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या दोन सामन्यात सरस प्रदर्शन केलं. तसाच खेळ टीम इंडियाला शनिवारी दाखवता आला नाही. इंग्लंडकडून टीम इंडियाचा पराभव झाला. टीम इंडियाचा या वर्ल्ड कपमधील हा पहिला पराभव आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयाची हॅट्रिक करेल, असं सर्वांना वाटलं होतं. पण हे काम इंग्लंडच्या टीमने केलं. टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा इंग्लंड विरुद्ध हा सहावा पराभव आहे. महिला टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कपमध्ये अजूनपर्यंत एकदाही इंग्लंडला हरवता आलेलं नाहीय.

टीम इंडियाकडून दोघी जबरदस्त खेळल्या

इंग्लंडच्या टीमने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. पूर्ण 20 ओव्हर खेळल्यानंतर सात विकेट गमावून त्यांनी 151 धावा केल्या. टीम इंडिया 20 ओव्हर्समध्ये पाच विकेट गमावून 140 धावांपर्यंत पोहोचू शकली. टीम इंडियाकडून स्मृती मांधनाने सर्वाधिक 41 चेंडूत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 52 धावा केल्या. तिच्याशिवाय ऋचा घोषने 34 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 47 धावा केल्या. टीम इंडियाने हा सामना का गमावला? त्याची कारण जाणून घेऊया.

  1. हरमनप्रीतने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 29 धावात तीन विकेट गमावल्या होत्या. पण टीम इंडियाला या सुरुवातीचा फायदा उचलता आला नाही. मधल्या ओव्हरर्समध्ये टीम इंडियाने धावा दिल्या. त्यामुळे इंग्लंडची टीम 150 धावांपर्यंत पोहोचू शकली.2
  2. टीम इंडियाच्या फलंदाजांना विकेटवर पाय रोवण्याची गरज होती. पण ते बाद होत गेले. या मॅचमध्ये टीम इंडियाकडून स्मृती मांधना आणि ऋचा घोषशिवाय कोणाची चांगली भागीदारी झाली नाही. त्याची किंमत टीमला चुकवावी लागली.
  3. मांधनाने चांगला खेळ दाखवला. तिने अर्धशतक झळकावल होतं. पण ती चुकीच्यावेळी बाद झाली. त्यामुळे टीमच नुकसान झालं. मांधना शेवटपर्यंत टिकली असती, तर निकाल भारताच्या बाजूने लागला असता.4
  4. मांधना आऊट झाल्यानंतर ऋचा घोष एकटी लढली. अन्य खेळाडूंमध्ये विजयाची ती इच्छा दिसली नाही. ऋचाने उशिराने आक्रमक बॅटिंग सुरु केली. ती आधीच आक्रमक क्रिकेट खेळली असती, तर टीम इंडियाचा विजय झाला असता.
  5. क्रिकेटमध्ये मैदानात वेगाने धाव पळणं गरजेच असतं. या मॅचमध्ये टीम इंडियाची हीच कमजोरी दिसली. अनेकदा दोन रन्स काढण्याची संधी होती. पण एकच धाव पळून काढली. हे सुद्धा पराभवाच एक कारण आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.