AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG T20 WC : स्मृती मांधनाचा झुंजार खेळ, जिंकलेली मॅच टीम इंडिया कशी हरली?, ‘या’ 5 चुका महाग पडल्या

IND vs ENG T20 WC : टीम इंडियाचा या वर्ल्ड कपमधील हा पहिला पराभव आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयाची हॅट्रिक करेल, असं सर्वांना वाटलं होतं. पण हे काम इंग्लंडच्या टीमने केलं.

IND vs ENG T20 WC : स्मृती मांधनाचा झुंजार खेळ, जिंकलेली मॅच टीम इंडिया कशी हरली?, 'या' 5 चुका महाग पडल्या
Smirti mandhana
| Updated on: Feb 19, 2023 | 8:23 AM
Share

IND vs ENG T20 WC : भारताच्या महिला टीमने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या दोन सामन्यात सरस प्रदर्शन केलं. तसाच खेळ टीम इंडियाला शनिवारी दाखवता आला नाही. इंग्लंडकडून टीम इंडियाचा पराभव झाला. टीम इंडियाचा या वर्ल्ड कपमधील हा पहिला पराभव आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयाची हॅट्रिक करेल, असं सर्वांना वाटलं होतं. पण हे काम इंग्लंडच्या टीमने केलं. टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा इंग्लंड विरुद्ध हा सहावा पराभव आहे. महिला टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कपमध्ये अजूनपर्यंत एकदाही इंग्लंडला हरवता आलेलं नाहीय.

टीम इंडियाकडून दोघी जबरदस्त खेळल्या

इंग्लंडच्या टीमने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. पूर्ण 20 ओव्हर खेळल्यानंतर सात विकेट गमावून त्यांनी 151 धावा केल्या. टीम इंडिया 20 ओव्हर्समध्ये पाच विकेट गमावून 140 धावांपर्यंत पोहोचू शकली. टीम इंडियाकडून स्मृती मांधनाने सर्वाधिक 41 चेंडूत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 52 धावा केल्या. तिच्याशिवाय ऋचा घोषने 34 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 47 धावा केल्या. टीम इंडियाने हा सामना का गमावला? त्याची कारण जाणून घेऊया.

  1. हरमनप्रीतने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 29 धावात तीन विकेट गमावल्या होत्या. पण टीम इंडियाला या सुरुवातीचा फायदा उचलता आला नाही. मधल्या ओव्हरर्समध्ये टीम इंडियाने धावा दिल्या. त्यामुळे इंग्लंडची टीम 150 धावांपर्यंत पोहोचू शकली.2
  2. टीम इंडियाच्या फलंदाजांना विकेटवर पाय रोवण्याची गरज होती. पण ते बाद होत गेले. या मॅचमध्ये टीम इंडियाकडून स्मृती मांधना आणि ऋचा घोषशिवाय कोणाची चांगली भागीदारी झाली नाही. त्याची किंमत टीमला चुकवावी लागली.
  3. मांधनाने चांगला खेळ दाखवला. तिने अर्धशतक झळकावल होतं. पण ती चुकीच्यावेळी बाद झाली. त्यामुळे टीमच नुकसान झालं. मांधना शेवटपर्यंत टिकली असती, तर निकाल भारताच्या बाजूने लागला असता.4
  4. मांधना आऊट झाल्यानंतर ऋचा घोष एकटी लढली. अन्य खेळाडूंमध्ये विजयाची ती इच्छा दिसली नाही. ऋचाने उशिराने आक्रमक बॅटिंग सुरु केली. ती आधीच आक्रमक क्रिकेट खेळली असती, तर टीम इंडियाचा विजय झाला असता.
  5. क्रिकेटमध्ये मैदानात वेगाने धाव पळणं गरजेच असतं. या मॅचमध्ये टीम इंडियाची हीच कमजोरी दिसली. अनेकदा दोन रन्स काढण्याची संधी होती. पण एकच धाव पळून काढली. हे सुद्धा पराभवाच एक कारण आहे.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.