AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG, Virat Kohli : विराट कोहली पुन्हा ‘जैसे थे’, मँचेस्टरमध्येही फेल, विराटचा हा VIDEO पाहिला का?

33 वर्षीय विराट कोहली बऱ्याच दिवसांपासून चांगलं खेळण्याचा प्रयत्न करत आहे. जवळपास 3 वर्षांपासून चाहते त्याच्या 71व्या आंतरराष्ट्रीय शतकाची वाट पाहत आहेत. सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विराटला कोणतीही मोठी खेळी खेळता आली नाही.

IND vs ENG, Virat Kohli : विराट कोहली पुन्हा 'जैसे थे', मँचेस्टरमध्येही फेल, विराटचा हा VIDEO पाहिला का?
विराट कोहली पुन्हा 'जैसे थे'Image Credit source: social
| Updated on: Jul 18, 2022 | 7:24 AM
Share

IND vs ENG 3rd ODI  : विराटचं (Virat Kohli) हे काय चाललंय, असं म्हणायची वेळ आता त्याच्या चाहत्यांवर आलीय. पुन्हा एकदा विराटच्या कामगिरीत काहीही सुधारण झाली नसून परिस्थिती ‘जैसे थे’चं आहे.  भारताचा माजी कर्णधार विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही (IND vs ENG 3rd ODI) मोठी खेळी खेळू शकला नाही. ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे झालेल्या या सामन्यात विराटला इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज रीस टोपलीचा बळी गेला. डावाच्या 9व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विराट पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानं 22 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 17 धावांचे योगदान दिले. भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik pandya) (4/24) आणि लेग-स्पिनर युझवेंद्र चहल (3/60) यांनी 7 विकेट्स घेतल्यामुळे इंग्लंडचा डाव 45.5 षटकांत 259 धावांवर आटोपला. यजमान संघाचा कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक 60 धावा केल्या. त्याने 80 चेंडूंच्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार मारले.

पाहा हा व्हिडीओ

260 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 38 धावांत 3 विकेट गमावल्या. संघाची तिसरी विकेट म्हणून विराट कोहली पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने रीस टोपलीच्या बाहेर जाणारा चेंडू छेडला. चेंडू मधल्या कोनात आला जो पायाच्या दिशेने जात होता पण विराटची बॅट बाहेरच्या काठावर आदळली आणि कर्णधार जोस बटलरने त्याला विकेटच्या मागे पकडण्यात कोणतीही चूक केली नाही.

मोठी खेळी खेळता आली नाही

33 वर्षीय विराट कोहली बऱ्याच दिवसांपासून चांगलं खेळण्याचा प्रयत्न करत आहे. जवळपास 3 वर्षांपासून चाहते त्याच्या 71व्या आंतरराष्ट्रीय शतकाची वाट पाहत आहेत. सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विराटला कोणतीही मोठी खेळी खेळता आली नाही.

किती धावा केल्या?

बर्मिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या पुनर्नियोजित कसोटी सामन्यात विराटने दोन्ही डावात एकूण 31 धावा केल्या. त्यानंतर मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने पुनरागमन केले. मात्र, 9 जुलै रोजी एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात विराट 1 धावा करून बाद झाला. यानंतर नॉटिंगहॅम टी-20 सामन्यात 11 धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर झालेल्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो खेळला नाही. लॉर्ड्सच्या मैदानावर मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने केवळ 16 धावा केल्या आणि आता तो 17 धावांवर बाद झाला.

वनडे मालिका जिंकणारा इंग्लंडमधील दुसरा संघ

टीम इंडिया 2015 पासून गेल्या आठ वर्षांत द्विपक्षीय वनडे मालिका जिंकणारा इंग्लंडमधील दुसरा संघ आहे. यादरम्यान इंग्लंडने सात संघांविरुद्ध 15 द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळली आहे. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाने 2015 मध्ये इंग्लंडचा 3-2 आणि 2020 मध्ये 2-1 असा पराभव केला होता.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.