AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : उपांत्य फेरीच्या सामन्यात रोहित शर्मा बदल करणार का? अशी असू शकते प्लेइंग 11

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील धडकी वाढवणारा उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होत आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. आतापर्यंत रोहित शर्माने टीम इंडियात फक्त एकच बदल केलेला आहे. मोहम्मद सिराजऐवजी कुलदीप यादवला संधी दिली आहे. पण महत्त्वाच्या सामन्यात बदल करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

IND vs ENG : उपांत्य फेरीच्या सामन्यात रोहित शर्मा बदल करणार का? अशी असू शकते प्लेइंग 11
| Updated on: Jun 26, 2024 | 7:25 PM
Share

भारतीय संघाला गेल्या 11 वर्षांपासून सुरु असलेल्या आयसीसी चषकांचा दुष्काळ दूर करण्याची संधी आहे. कारण आयसीसी टी20 वर्ल्डकप 2024 जेतेपदापासून दोन विजय दूर आहे. उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना 27 जूनला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता होणार आहे. या सामन्यातून टीम इंडियाला इंग्लंडकडून जुना हिशेब चुकता करण्याची संधी आहे. 2022 टी20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने भारताला पराभूत केलं होतं. भारताने दिलेलं 169 धावांचं लक्ष्य एकही विकेट न गमवता पूर्ण केलं होतं. असं असलं तरी सुरु असलेल्या स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. त्यामुळे या सामन्यात टीम इंडिया मागच्या पराभवाचा वचपा काढू शकते. टी20 क्रिकेटमध्ये दोन्ही संघ 23 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी 12 सामन्यात भारताने तर 11 सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे. टी20 वर्ल्डकपमध्ये दोन वेळा आमनेसामने आले आणि दोन-दोन विजय मिळवले आहेत.

उपांत्य फेरीत रोहित शर्माकडून पुन्हा एकदा अपेक्षा आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माने 92 धावांची खेळी केली होती. पण दुसरीकडे, विराट कोहलीच्या फॉर्ममुळे चिंता वाढली आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये असून नसल्यासारखा झाला आहे. त्याच्या बॅटमधून अजूनही हव्या तशा धावा येत नाहीत. आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यात त्याने एकूण 66 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या ऐवजी यशस्वी जयस्वालचा विचार होऊ शकतो. पण रोहित शर्मा तसा काही निर्णय घेणार आहे. विराटची बॅट चालत नसली तरी त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वालला पुन्हा एकदा बेंचवरच बसावं लागेल.

सूर्यकुमार यादवसाठी तसा कोणता पर्याय नाही. पण शिवम दुबेऐवजी यशस्वी किंवा संजू सॅमसनचा विचार होऊ शकतो. पण शिवम गोलंदाजीसाठी एक पर्याय आहे. त्यामुळे शिवमला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढणं कठीण आहे. तर फिरकीपटूची जबाबदारी रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादवच्या खांद्यावर असेल. तर जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगकडे वेगवान गोलंदाजीची धुरा असेल.

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह और अर्शदीप सिंग.

Follow Us
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.