AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs IRE, 2nd T20, Umran Malik : शेवटच्या षटकात उमरान मलिक बनला हिरो, प्रत्येक चेंडूवर श्वास रोखला, जाणून घ्या सामन्यातील थरार

शेवटच्या षटकात आयर्लंडला विजयासाठी 17 धावांची गरज होती आणि उमराननं सातत्यानं सुमारे 140 किमी प्रतितास वेगानं गोलंदाजी केली. असाच काहीसा शेवटच्या षटकाचा थरार होता. उमराननं आपल्या वेगवान गोलंदाजीनं आणि चतुराईनं भारताला सामना जिंकून दिला.

IND vs IRE, 2nd T20, Umran Malik : शेवटच्या षटकात उमरान मलिक बनला हिरो, प्रत्येक चेंडूवर श्वास रोखला, जाणून घ्या सामन्यातील थरार
उमरान मलिकImage Credit source: social
| Updated on: Jun 29, 2022 | 10:15 AM
Share

नवी दिल्ली : आयर्लंड विरुद्धच्या (IND vs IRE) मालिकेसह टी-20 (T20) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उमरान मलिकला (Umran Malik) पदार्पण करण्याची संधी मिळाली. पहिल्या सामन्यात तो फक्त एक षटक टाकू शकला. पण दुसऱ्या सामन्यात त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली. उमरानने आयर्लंडविरुद्धच्या चांगल्या धावसंख्येच्या सामन्यात चार षटकांत 42 धावा देत विकेट घेतली. उमरानला कर्णधार हार्दिक पांड्यानं शेवटच्या षटकापर्यंत जवळ ठेवलं आणि वेगवान गोलंदाज मलिकनंही आपल्या कर्णधाराला निराश केले नाही. मार्क एडर आणि जॉर्ज डॉकरेल ज्या पद्धतीने फलंदाजी करत होते. त्यामुळे शेवटच्या षटकात 17 धावा केल्यानंतर आयर्लंड मोठा अपसेट करेल असं वाटत होतं. मात्र, उमराननं आपल्या वेगवान गोलंदाजीनं आणि चतुराईनं भारताला सामना जिंकून दिला.

गोलंदाजीचा थरार

शेवटच्या षटकात आयर्लंडला विजयासाठी 17 धावांची गरज होती आणि उमराननं सातत्यानं सुमारे 140 किमी प्रतितास वेगानं गोलंदाजी केली. असाच काहीसा शेवटच्या षटकाचा थरार होता.

  1. पहिला चेंडूमध्य काय झालं? – मार्क एडर 6 चेंडूत 13 धावा खेळत असताना स्ट्राईकवर होता. उमरानने 142 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. ऑफच्या बाहेरच्या लेन्थ बॉलवर एडरला एकही धाव करता आली नाही आणि त्यानंतर आयर्लंडला पाच चेंडूत 17 धावांची गरज होती.
  2. दुसरा चेंडू (नो-बॉल) – उमरानने 142 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली. आणखी एक चेंडू टाकला. ज्यावर एडर एकही धाव काढू शकला नाही. उमरानचा पाय क्रीजच्या बाहेर गेला. यामुळे तो नो-बॉल झाला. आता पाच चेंडूत 16 धावा हव्या होत्या.
  3. चेंडूचा वेग किती? दुसरा चेंडू 142 किमी प्रतितास वेगाने टाकलेल्या या चेंडूवर अडेरने चौकार मारला. या धावा अतिरिक्त कव्हर क्षेत्रातून आल्या आणि आता आयर्लंडला चार चेंडूत 12 धावांची गरज होती. या चौकारानंतर भारतीय छावणीत खळबळ उडाली होती.
  4. तिसरा चेंडू – 145 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. पण उमरानला लाईन आणि लेन्थ नियंत्रित करता आली नाही. एडरने स्वत:साठी जागा बनवली आणि दुसरा चौकार मारला. तीन चेंडूत आठ धावा हव्या होत्या. टीम इंडियाच्या चेहऱ्यावर तणाव दिसू लागला. चाहतेही दाताखाली बोटे दाबू लागले होते.
  5. चौथा चेंडू – 144 किमी प्रतितास वेगाने फेकलेला चेंडू जो एडरला फारसा वाचता आला नाही. कसा तरी बॅटने धाव घेतली. आता दोन चेंडूत विजयासाठी सात धावांची गरज होती.
  6. पाचवा चेंडू – डॉकरेल स्ट्राईकवर आला आणि उमरानच्या यॉर्करलाही फलंदाजी करता आली नाही. बायमधून आयर्लंडच्या खात्यात एक धाव जमा झाली आणि भारतानं सामन्यात शानदार पुनरागमन केलं. आता आयर्लंडला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर षटकार हवा होता.
  7. सहावा चेंडू – उमराननं 142 किमी प्रतितास वेगाने शॉर्ट लेन्थ बॉल टाकला. या चेंडूवर एडरला फक्त एकच धाव घेता आली आणि भारतानं हा सामना चार धावांनी जिंकला. उमरानच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. भारतीय खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केलं.

सुरुवात खराब

भारताची सुरुवात चांगली झाली नाही आणि इशान किशन तीन धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तिसर्‍याच षटकात लॉर्कन टकरकडे मार्क एडायरच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन त्याने आपली विकेट गमावली. यानंतर हुडा आणि सॅमसन यांनी 85 चेंडूत 176 धावांची भागीदारी करत भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.

Follow Us
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने...
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने....
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं.
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक......
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक.......
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP...
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP....
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ.
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!.
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत.
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो.
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे...
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे....