India vs New Zealand 1st T20: टीम इंडिया हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरीज जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. टीम इंडियाने रोहित शर्मा, विराट कोहली सारख्या दिग्ग्ज प्लेयर्सना विश्रांती दिलीय. त्यांच्या अनुपस्थितीत युवा प्लेयर्सकडे चांगला खेळ दाखवण्याची संधी आहे. टी 20 सीरीजसाठी टीम इंडियात चार वेगवान गोलंदाज आहेत. आता हार्दिक पंड्या या चौघांपैकी कोणाला संधी देणार? त्यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागेल. न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरीजसाठी भारतीय टीममध्ये अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार हे चार फास्ट बॉलर्स आहेत. या खेळाडूंनी मागच्या काही काळात चांगलं प्रदर्शन केलय. भारतीय प्लेइंग 11 फक्त 3 वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते. या चार पैकी कुठल्या एका बॉलरला बाहेर बसवलं जाईल.