
भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये इंग्लंडवर मात केली. टीम इंडियाने 254 रन्सचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला 246 रन्सवर रोखलं. भारताने अशाप्रकारे हा सामना 7 धावांनी जिंकत वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. टीम इंडियाने या विजयासह वर्ल्ड कप ट्रॉफीवर एक हात ठेवला आहे. आता ही ट्रॉफी कोण उंचावणार? हे रविवारी 8 मार्चला निश्चित होणार आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील अंतिम सामन्यात टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. हा सामना टीम इंडिया जिंकणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील न्यूझीलंड विरुद्धची आकडेवारी चिंताजनक आहे. टीम इंडियाने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात न्यूझीलंड विरुद्ध 3 सामने खेळले आहेत. न्यूझीलंडने हे तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे न्यूझीलंड आता टीम इंडिया विरुद्ध अंतिम फेरीत कशी कामिगिरी करत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. टीम इंडियाने 2025 साली अंतिम फेरीत न्यूझीलंडला पराभूत करत आयसीसी चॅम्पियिन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे तेव्हा न्यूझीलंडला पराभवाचा सामना करत उपविजेतेपदावर समाधान मानवं लागलं होतं.
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन(विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रिंकू सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर.