AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup: IND vs PAK मॅचवर महासंकट, असं झाल्यास फॅन्सच्या पदरी निराशा

T20 World Cup: सगळेच आतुरतेने वाट पाहतायत, पण भारत-पाकिस्तान महामुकाबल्यावर असं काय संकट आहे?

T20 World Cup: IND vs PAK मॅचवर महासंकट, असं झाल्यास फॅन्सच्या पदरी निराशा
Ind vs pak
| Updated on: Oct 16, 2022 | 10:56 AM
Share

मुंबई: भारतच नाही, जगभरातील क्रिकेट चाहत्यांना भारत-पाकिस्तान (IND vs PAK) लढतीची प्रतिक्षा आहे. सगळेच या मॅचची आतुरतेने वाट पाहतायत. भारत-पाक सामन्यात चाहत्यांना क्रिकेटचा (Cricket) एक वेगळा रोमांच, थरार अनुभवता येतो. त्यामुळे टेस्ट, वनडे असो वा टी 20 क्रिकेट चाहते नेहमीच या मॅचची (Match) आतुरतेने वाट पाहत असतात.

थोडं टेन्शन वाढवणारी बातमी

ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप सुरु झाला आहे. भारत-पाकिस्तान सामन्याचा क्षण जवळ येतोय. 23 ऑक्टोबरला ऐतिहासिक मेलबर्नच्या मैदानात दोन्ही टीम्स आमने-सामने येतील. या महामुकाबल्याआधी थोडं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. भारत-पाकिस्तान सामन्यावर महासंकट आहे. जमीन नाही, तर आकाशातून हे संकट कोसळू शकतं.

आनंदावर विरजण पडू शकतं

टी 20 वर्ल्ड कपमध्ये 23 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना होईल. मेलबर्नच्या हवामानामुळे क्रिकेट चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडू शकतं. मॅचच्या दिवशी मेलबर्नमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस खेळ बिघडवू शकतो. मॅचच्या एकदिवस आधी सुद्धा मेलबर्नमध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज आहे. म्हणून हे आसमानी संकट जास्त मोठं आहे.

IND vs PAK मॅचआधी वाईट बातमी

वेदर फोरकास्ट एजन्सीनुसार, ऑस्ट्रेलियाच्या 3 राज्यात 20 ऑक्टोबरपासून पाऊस कोसळू शकतो. हवामान या दिवसात थंड राहील. बदलत्या हवामानाचा परिणाम मेलबर्नमध्ये सुद्धा दिसेल.

हवामानाची माहिती देणाऱ्या एक्यूवेदरनुसार, मेलबर्नमध्ये 23 ऑक्टोबरला सकाळी पाऊस कोसळू शकतो. त्यानंतर संपूर्ण दिवस ढगाळ हवामान राहील. मॅचच्या एकदिवस आधी 22 ऑक्टोबरला आकाशात काळे ढग असतील. अधून-मधून पाऊस सुरु राहिलं.

मॅच न झाल्यास काय होईल?

मॅच सुरु होण्याच्या 24 तास आधी मेलबर्नमधील हवामान बिघडलेलं असेल. सामन्याच्यावेळी असं काही नको होऊं दे अशीच चाहत्यांची इच्छा असेल. भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला, तर अशा स्थितीत दोन्ही टीम्सना 1-1 पॉइंट मिळेल.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.