AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA T 20 Match: ‘या’ तीन कारणांमुळे टीम इंडियाने ‘करो या मरो’ मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेवर मिळवला विजय

विशाखापट्टनम येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) तिसरा टी 20 सामना झाला. भारतासाठी आजचा सामना 'करो या मरो' होता. काहीही करुन भारताला आज विजय मिळवण आवश्यक होतं.

IND vs SA T 20 Match: 'या' तीन कारणांमुळे टीम इंडियाने 'करो या मरो' मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेवर मिळवला विजय
India win against SaImage Credit source: PTI
| Updated on: Jun 14, 2022 | 10:51 PM
Share

मुंबई: विशाखापट्टनम येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) तिसरा टी 20 सामना झाला. भारतासाठी आजचा सामना ‘करो या मरो’ होता. काहीही करुन भारताला आज विजय मिळवण आवश्यक होतं. कारण पाच सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ (South Africa Team) 2-0 ने आघाडीवर होता. आजचा सामना हरला, तर दक्षिण आफ्रिकेची मालिकेत विजयी आघाडी झाली असती. त्यामुळे भारताला आज सामना जिंकावाच लागणार होता. भारतीय संघाने आज अपेक्षित कामगिरी केली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर (south Africa) पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. दक्षिण आफ्रिकेला कुठेही डोक वर काढण्याची संधी दिली नाही. पूर्णपणे सामन्यावर नियंत्रण गाजवलं. ‘करो या मरो’, सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 48 धावांनी मोठा विजय मिळवला. भारताने विजयासाठी 180 धावांचे लक्ष्य दिले होते. दक्षिण आफ्रिकेचा संघ निर्धारित 20 षटकात 131 धावांवर ऑलआऊट झाला.

  1. भारताचे सलामीवर ऋतुराज गायकवाड आणि इशान किशनने दमदार सुरुवात करुन दिली. पहिल्या 10 षटकात भारताच्या एक बाद 97 धावा झाल्या. पावरप्लेमध्येच भारताच्या बिनबाद 57 धावा झाल्या होत्या. केएल राहुलच्या जागी संधी मिळालेल्या ऋतुराज गायकवाडने आज मिळालेल्या संधीच सोनं केलं. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु धु धुतलं. पावरप्लेमध्ये भारताला चांगली सुरुवात मिळत नव्हती. ती आज मिळाली. त्याच्या झंझावातामुळेच भारताला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण करता आला. ऋतुराजने 35 चेंडूत 57 धावा केल्या. यात सात चौकार आणि दोन षटकार आहेत. ऋतुराजला संपूर्ण आयपीएलच्या सीजनमध्ये लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. आज त्याने ती भरपाई केली. इशान किशननेही 35 चेंडूत 54 धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि दोन षटकार होते. दोघांनी मजबूत धावसंख्येचा पाया रचला.
  2. श्रेयस अय्यर (14), इशान किशन (54) कॅप्टन ऋषभ पंत (6) आणि दिनेश कार्तिक (6) झटपट आऊट झाले. त्यामुळे भारतावर दबाव होता. त्यावेळी उपकर्णधार हार्दिक पंड्याने 21 चेंडूत नाबाद 31 धावांची उपयुक्त खेळी केली. त्यामुळे भारताला 179 धावांपर्यंत पोहोचता आले.
  3. गोलंदाजी भारताची मुख्य डोकेदुखी ठरली होती. पण आज गोलंदाजांनी आपल्या कामगिरीचा स्तर उंचावला. मागच्या दोन सामन्यात मार खाणाऱ्या युजवेंद्र चहलने चार षटकात 20 धावा देत 3 विकेट काढल्या. हर्षल पटेलने 19 चेंडूत 25 धावा देत चार विकेट काढल्या. भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि अक्षर पटेल यांनी टिच्चून मारा केला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला मोकळेपणाने फटकेबाजी करता आली नाही. सुरुवातीपासून त्यांच्यावर दबाव राहिला. अखेरीस त्यांचा डाव 131 धावात आटोपला.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.