AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA T 20 Match: ‘या’ तीन कारणांमुळे टीम इंडियाने ‘करो या मरो’ मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेवर मिळवला विजय

विशाखापट्टनम येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) तिसरा टी 20 सामना झाला. भारतासाठी आजचा सामना 'करो या मरो' होता. काहीही करुन भारताला आज विजय मिळवण आवश्यक होतं.

IND vs SA T 20 Match: 'या' तीन कारणांमुळे टीम इंडियाने 'करो या मरो' मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेवर मिळवला विजय
India win against SaImage Credit source: PTI
| Updated on: Jun 14, 2022 | 10:51 PM
Share

मुंबई: विशाखापट्टनम येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) तिसरा टी 20 सामना झाला. भारतासाठी आजचा सामना ‘करो या मरो’ होता. काहीही करुन भारताला आज विजय मिळवण आवश्यक होतं. कारण पाच सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ (South Africa Team) 2-0 ने आघाडीवर होता. आजचा सामना हरला, तर दक्षिण आफ्रिकेची मालिकेत विजयी आघाडी झाली असती. त्यामुळे भारताला आज सामना जिंकावाच लागणार होता. भारतीय संघाने आज अपेक्षित कामगिरी केली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर (south Africa) पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. दक्षिण आफ्रिकेला कुठेही डोक वर काढण्याची संधी दिली नाही. पूर्णपणे सामन्यावर नियंत्रण गाजवलं. ‘करो या मरो’, सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 48 धावांनी मोठा विजय मिळवला. भारताने विजयासाठी 180 धावांचे लक्ष्य दिले होते. दक्षिण आफ्रिकेचा संघ निर्धारित 20 षटकात 131 धावांवर ऑलआऊट झाला.

  1. भारताचे सलामीवर ऋतुराज गायकवाड आणि इशान किशनने दमदार सुरुवात करुन दिली. पहिल्या 10 षटकात भारताच्या एक बाद 97 धावा झाल्या. पावरप्लेमध्येच भारताच्या बिनबाद 57 धावा झाल्या होत्या. केएल राहुलच्या जागी संधी मिळालेल्या ऋतुराज गायकवाडने आज मिळालेल्या संधीच सोनं केलं. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु धु धुतलं. पावरप्लेमध्ये भारताला चांगली सुरुवात मिळत नव्हती. ती आज मिळाली. त्याच्या झंझावातामुळेच भारताला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण करता आला. ऋतुराजने 35 चेंडूत 57 धावा केल्या. यात सात चौकार आणि दोन षटकार आहेत. ऋतुराजला संपूर्ण आयपीएलच्या सीजनमध्ये लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. आज त्याने ती भरपाई केली. इशान किशननेही 35 चेंडूत 54 धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि दोन षटकार होते. दोघांनी मजबूत धावसंख्येचा पाया रचला.
  2. श्रेयस अय्यर (14), इशान किशन (54) कॅप्टन ऋषभ पंत (6) आणि दिनेश कार्तिक (6) झटपट आऊट झाले. त्यामुळे भारतावर दबाव होता. त्यावेळी उपकर्णधार हार्दिक पंड्याने 21 चेंडूत नाबाद 31 धावांची उपयुक्त खेळी केली. त्यामुळे भारताला 179 धावांपर्यंत पोहोचता आले.
  3. गोलंदाजी भारताची मुख्य डोकेदुखी ठरली होती. पण आज गोलंदाजांनी आपल्या कामगिरीचा स्तर उंचावला. मागच्या दोन सामन्यात मार खाणाऱ्या युजवेंद्र चहलने चार षटकात 20 धावा देत 3 विकेट काढल्या. हर्षल पटेलने 19 चेंडूत 25 धावा देत चार विकेट काढल्या. भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि अक्षर पटेल यांनी टिच्चून मारा केला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला मोकळेपणाने फटकेबाजी करता आली नाही. सुरुवातीपासून त्यांच्यावर दबाव राहिला. अखेरीस त्यांचा डाव 131 धावात आटोपला.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार