AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA Final : अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर विजेत्याची घोषणा कशी केली जाणार? जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होणार आहे. बार्बाडोसच्या ब्रिजटाऊनमध्ये होणाऱ्या सामन्यात पावसाचं सावट आहे. वेदर डॉक कॉमनुसार 29 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 70 टक्के पावसाची शक्यता आहे. जर सामना पावसामुळे रद्द करण्याची वेळ आली तर विजेता कोण ते जाणून घ्या.

IND vs SA Final : अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर विजेत्याची घोषणा कशी केली जाणार? जाणून घ्या
| Updated on: Jun 28, 2024 | 7:33 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत होणार आहे. 29 जूनला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना होणार आहे. भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभूत करत फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. तर दक्षिण अफ्रिकेने टी20 वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे अंतिम फेरीत हे दोन्ही संघ पहिल्यांदाच भिडणार आहेत. पण या सामन्यावर पावसाचं दाट सावट आहे. अंतिम सामन्यात पाऊस पडेल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. Weather.com नुसार, 29 जून रोजी बार्बाडोसमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान पावसाची 70 टक्के शक्यता आहे. त्यामुळे पावसामुळे सामन्यात वारंवार खंड पडण्याची शक्यता आहे.आयसीसीने अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवला आहे. 29 जूनचा सामना पावसामुळे रद्द झाला तर हा सामना 30 जूनला खेळवला जाईल. तसेच अंतिम सामन्यासाठी 190 मिनिटांचा अतिरिक्त वेळही ठेवण्यात आला आहे.

पावसामुळे सामना झालाच नाही तर विजेत्या कोणाला घोषित केलं जाईल असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर सुपर 8 फेरीत टॉप असलेल्या संघाला पुढची संधी दिली जाणार होती. पण तसं काही झालं नाही. दोन्ही उपांत्य फेरीचे व्यवस्थितरित्या पार पडले. भारत इंग्लंड सामन्यात पावसाचा व्यत्यय आला पण सामना पूर्ण झाला. अंतिम फेरीसाठी असा काही वेगळा नियम नाही. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द करण्याची वेळ आली तर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांना संयुक्तपणे विजेता घोषित केले जाईल.

दोन्ही संघाचे खेळाडू

दक्षिण अफ्रिका : एडेन मार्कराम (कर्णधार) , ओटनील बार्टमन , गेराल्ड कोएत्झी , क्विंटन डी कॉक (विकेटकीपर) , ब्योर्न फॉर्च्युइन , रीझा हेंड्रिक्स , मार्को जॅन्सेन , हेनरिक क्लासेन , केशव महाराज , डेव्हिड मिलर , ॲनरिक नॉर्टजे , कागिसो रबाडा , सेंट ट्रायब्स्स्टन , ट्रायब्स्स्टन , रियान टॅब्सी.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार) , हार्दिक पंड्या , यशस्वी जयस्वाल , विराट कोहली , सूर्यकुमार यादव , ऋषभ पंत , संजू सॅमसन , शिवम दुबे , रवींद्र जडेजा , अक्षर पटेल , कुलदीप यादव , युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंह , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

Follow Us
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा.
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा.
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला.
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून....
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून.....