AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDvSL 3rd ODI : टीम इंडिया तिसरा सामना जिंकून श्रीलंकेला क्लीन स्वीप देणार?

कर्णधार रोहित शर्माने या मालिकेत आतापर्यंत पहिल्या 2 सामन्यात इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या दोघांना संधी दिली नाही. या दोघांऐवजी संघात शुबमन गिल आणि केएल राहुलचा समावेश करण्यात आला होता.

INDvSL 3rd ODI : टीम इंडिया तिसरा सामना जिंकून श्रीलंकेला क्लीन स्वीप देणार?
| Updated on: Jan 14, 2023 | 11:26 PM
Share

तिरुवअंनतपूरम : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात रविवारी 15 जानेवारीला एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना दक्षिणेतील तिरुअंनतपूरममध्ये पार पडणार आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना जिंकून श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न रोहितसेनेचा असेल. तर विजय मिळवून भारत दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न श्रीलंकेचा असेल.

पुन्हा इशान-सूर्यकुमारला डच्चू?

कर्णधार रोहित शर्माने या मालिकेत आतापर्यंत पहिल्या 2 सामन्यात इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या दोघांना संधी दिली नाही. या दोघांऐवजी संघात शुबमन गिल आणि केएल राहुलचा समावेश करण्यात आला होता. दुसऱ्या सामन्यात केएलने निर्णायक क्षणी नाबाद अर्धघशतक करुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला. तर शुबमन गिलनेही पहिल्या सामन्यात लौकीकाला साजेशी खेळी केली. मात्र या दोघांमुळे इशान आणि सूर्यकुमारला बेंचवर रहावं लागलं.

आता टीम इंडिया 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात सूर्या-इशानऐवजी नवख्या खेळाडूंना संधी मिळेल, अशी शक्यता आहे. त्यापलिकडे प्लेइंग इलेव्हनमध्ये एकच बदल होणार असल्याचं म्हटलं जात आहे. अक्षर पटेलऐवजी वॉशिंग्टन सुंदरचा समावेश केला जाऊ शकतो.

हेड टु हेड

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 164 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाचा यामध्ये दबदबा राहिला आहे. टीम इंडियाने 95 सामन्यांमध्ये श्रीलंकेवर विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाला श्रीलंकेने 57 वेळा पराभव स्वीकार करावा लागलाय. शिवाय 11 सामने अनिर्णित राहिलेत. तर 1 मॅच बरोबरीत सुटलीय.

संभावित प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह.

टीम श्रीलंका : दसुन शनाका (कर्णधार), कुशल मेंडिस (उपकर्णधार), पथुम निशांका, अविश्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमे, चरिथ असालंका, धनंजय डि सिल्वा, आशेन बांद्रा, महीष तिक्षाणा, जेफरी वेंडरसे, चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, कसुन रजिथा, नुवांदु फर्नांडो, दुनिथ वेल्लागे, प्रमोद मुधशन आणि लाहिरु कुमारा.

Follow Us
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी शिक्षण मंत्री
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या घरी, राज्याच्या राजकारणात मोठं घडतंय?
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत ठाकरे
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत उद्धव ठाकरे हे काय म्हणाले?
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंचं भाषण...
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंच्या भाषणाची जोरदार चर्चा