AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs West Indies, 2nd ODI Preview: वेस्ट इंडिज पलटवार करणार की भारत मालिका जिंकणार? आज फैसला

आज भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना (2nd ODI) खेळवला जाणार आहे. पण, वेस्ट इंडिज भारताला तगडी लढत देऊन मालिकेतं आव्हान जिवंत ठेवणार की, भारत मालिका जिंकणार याचा निकाल आजच्याच सामन्यात लागेल. वास्तविक 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 1-0 ने पुढे आहे.

India vs West Indies, 2nd ODI Preview: वेस्ट इंडिज पलटवार करणार की भारत मालिका जिंकणार? आज फैसला
Rohit Sharma- Kieron Pollard
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 09, 2022 | 10:57 AM
Share

मुंबई : आज भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना (2nd ODI) खेळवला जाणार आहे. पण, वेस्ट इंडिज भारताला तगडी लढत देऊन मालिकेतं आव्हान जिवंत ठेवणार की, भारत मालिका जिंकणार याचा निकाल आजच्याच सामन्यात लागेल. वास्तविक 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 1-0 ने पुढे आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवलेला पहिला एकदिवसीय सामना भारताने 6 गडी राखून जिंकला होता. अशा परिस्थितीत आता त्याच मैदानावर खेळवली जाणारी दुसरी वनडेही भारताने जिंकली, तर मालिकेवर टीम इंडियाचाच ताबा असेल. मात्र, वेस्ट इंडिज संघाला ते अजिबात परवडणार नाही. त्यामुळे मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ आज पलटवार करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजची फलंदाजी डळमळीत झाली होती. अष्टपैलू जेसन होल्डर वगळता इतर कोणत्याही फलंदाजाने भारतीय गोलंदाजीचा सामना केला नाही. पाहुण्या संघाला दुसऱ्या वनडेत मागील चुकीची पुनरावृत्ती टाळायची आहे. त्याचवेळी, सिरीज जिंकण्याचे मनसुबे बाळगणाऱ्या भारतीय संघाला आजच्या सामन्यात कॅरेबियन्सचा पराभव करायचा आहे.

वेस्ट इंडिज पलटवार करणार की भारत मालिका जिंकणार?

मोटेराच्या मैदानावर उभय संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांवर नजर टाकली तर वेस्ट इंडिजचे पारडे जड दिसते. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज मोटेरा येथे सातवा एकदिवसीय सामना होणार आहे. पण याआधी झालेल्या 6 सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजने 4, तर भारताने फक्त 2 सामने जिंकले आहेत. उभय संघांची अलीकडची कामगिरी पाहता भारताचं पारडं जड आहे. कारण दोन्ही संघांमधील मागील 5 एकदिवसीय सामन्यांपैकी 4 सामने भारताने जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिजला फक्त 1 सामना जिंकता आला आहे.

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारतीय भूमीवर आज भारत आणि वेस्ट इंडिज 60 व्या सामन्यात आमनेसामने येणार आहेत. याआधी खेळलेल्या दोन्ही संघांमधील एकूण 59 एकदिवसीय सामन्यांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली आहे. कारण 59 पैकी 30 सामने भारताने जिंकले आहेत तर वेस्ट इंडिजने 28 सामने जिंकले आहेत. तर एक सामना टाय झाला आहे.

2022 मधल्या पहिल्या मालिका विजयाची संधी

आजच्या सामन्यात भारतीय प्लेइंग इलेव्हनच्या टॉप ऑर्डरमध्ये बदल पाहायला मिळू शकतो. मात्र वेस्ट इंडिज संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे. भारताने या वर्षात आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही मालिका जिंकलेली नाही. त्यांच्याकडे वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. पण, वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात संधीचे सोने करणे तितकेसे सोपे नसेल.

इतर बातम्या

Under 19 World cup: ‘हे’ आहेत वर्ल्डकप गाजवणारे महाराष्ट्राचे चार खेळाडू, गरज असताना मुंबई-पुणेकरांचा जबरदस्त परफॉर्मन्स

IND vs WI: सुर्य कुमार यादवला भडकवणारा तो जोडीदार कोण? मागच्या मॅचमध्ये काय झालं?

तालिबानची दहशत! अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, U19 World Cup टीममधले चौघे मायदेशी परतलेच नाहीत

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.