AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI 2nd ODI : टीम इंडियामध्ये दुसऱ्या सामन्यात धक्कादायक बदल! कर्णधारालाच दाखवला बाहेरचा रस्ता

भारत विरुद्ध वेस्ट इंडिया यांच्या दुसरा वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये काही धक्कादायक बदल करण्यात आले आहेत. दिग्गज खेळाडूंना बाहेर बसवण्यात आलं आहे.

IND vs WI 2nd ODI : टीम इंडियामध्ये दुसऱ्या सामन्यात धक्कादायक बदल! कर्णधारालाच दाखवला बाहेरचा रस्ता
IND vs WI 2nd ODI : वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी भारतीय संघात आश्चर्यकारक प्रयोग, क्रीडाप्रेमींमध्ये संभ्रम
| Updated on: Jul 29, 2023 | 8:33 PM
Share

मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. पहिला वनडे सामना जिंकत भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. वनडे वर्ल्डकपपूर्वी ही मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे. या मालिकेतून वनडे संघासाठी खेळाडूंची निवड करणं सोपं होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर टीम इंडियामध्ये काही बदल केले जात आहेत. असं असताना आता दुसऱ्या वनडेत काही धक्कादायक बदल टीम इंडियात पाहायला मिळाले. दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आराम देण्यात आला आहे. तर टीम इंडियाचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपण्यात आले.

संघात काय बदल केले आहेत

टीम इंडियामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या जागी अक्षर पटेल आणि संजू सॅमसन यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे. कोण कोणत्या स्थानावर खेळणार याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकत वेस्ट इंडिज संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मैदानावर गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार आहे.

काय म्हणाला कर्णधार हार्दिक पांड्या?

आम्हालाही पहिल्यांदा फलंदाजीच करायची होती. आम्ही यावर कशा धावा करतो ते पाहायचं आहे. रोहित आणि विराट सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. आम्हाला काही प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांना विश्रांती दिली आहे. तिसऱ्या वनडेसाठी ते पुन्हा मैदानात उतरतील. गोलंदाजांनी पहिल्या वनडेत 115 धावांवर रोखलं होतं. गोलंदाजांचा चांगला प्रयत्न होता. आता आम्ही वेगळ्या क्षेत्रात सुधारणा करू इच्छित आहोत. पाच ऐवजी आम्ही दोन गडी गमवून हा सामना जिंकू शकलो असतो. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या जागेवर संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांना संधी दिली आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): ब्रँडन किंग, काइल मेयर्स, अॅलिक अथनाझे, शाई होप (विकेटकीपर, कर्णधार), शिम्रॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, गुडाकेश मोटी, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स

भारत (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.