AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : टीम इंडियाचा कॅप्टन अखेर बदललाच, एका मुंबईकरच्या एन्ट्रीनंतर दुसरा मुंबईकर OUT

हिटमॅन रोहित शर्मा असून त्याला संघातून वगळण्यात आलं आहे. अजित आगरकर हा मुंबईकर खेळाडू असून रोहित शर्मा बाहेर गेल्याने सोशल मीडियावर नेटकरी मीम्स व्हायरल करत आहेत. पाहा आता नवीन खेळाडू कोण आहे ज्याच्याकडे कर्णधारपद दिलं आहे.

Team India : टीम इंडियाचा कॅप्टन अखेर बदललाच, एका मुंबईकरच्या एन्ट्रीनंतर दुसरा मुंबईकर OUT
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 05, 2023 | 11:46 PM
Share

मुंबई : वेस्ट इंडिज विरूद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली असून रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. निवड समितीच्या अध्यक्षपदा अजित आगरकर यांची निवड करण्यात आली आहे. आगरकर यांनी निवडलेल्या पहिल्या टीममध्ये मुंबईकर खेळाडू बाहेर झाला आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नाहीतर हिटमॅन रोहित शर्मा असून त्याला संघातून वगळण्यात आलं आहे. अजित आगरकर हा मुंबईकर खेळाडू असून रोहित शर्मा बाहेर गेल्याने सोशल मीडियावर नेटकरी मीम्स व्हायरल करत आहेत.

कोण आहे नवीन कर्णधार?

रोहित शर्मा गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असल्याने त्याच्या कर्णधारपदाबाबत  सर्वांना चिंता वाटत आहे. बीसीसीआयने एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी रोहित शर्मा याच्याकडेच संघाचं कर्णधारपद ठेवलं आहे. मात्र टी-20 मालिकेमध्ये स्टार आणि ऑल राऊंडर खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.

बीसीसीआयने टी-20 मालिकेमध्ये रोहित शर्मा याच्या ऐवजी हार्दिक पंड्याकडे कॅप्टन्सी सोपवण्यात आली आहे.  रोहित शर्मासह काही मुख्य खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. मात्र अजित आगरकर यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे एक मुंबईकर इन तर दुसरा मुंबईकर आऊट झाल्याचं नेटकरी बोलत आहेत.

बीसीसीआयने टी-20 मालिकेसाठी निवडलेल्या संघात जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संधी दिली आहे. या संघामध्ये संजू सॅमसन आणि रवी बिश्नोई यांचं कमबॅक झालं असून यशस्वी जयस्वाल आणि  तिलक वर्मा यांची निवड झाली असून त्यांचा पहिल्यांदाच संघामध्ये समावेश झाला आहे.

टीम इंडिया टी-20 संघ : इशान किशन (W), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्य कुमार यादव (VC), संजू सॅमसन (W), हार्दिक पांड्या (C), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.

Follow Us
ड्रग्ज म्हणजे छुपं युद्ध! मुंबई ड्रग्जमुक्त करणारच!
Devendra Fadnavis Speech | ड्रग्ज म्हणजे छुपं युद्ध! मुंबई ड्रग्जमुक्त करणारच! मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
अभिजीत दीपकेला खरंच भाजपमधून ऑफर? भाजप प्रवक्ते काय म्हणाले?
अभिजीत दीपकेला खरंच भाजपमधून ऑफर? बोलता बोलता भाजप प्रवक्ते हे काय म्हणाले?
भाजपमध्ये या, नाहीतर गोळ्या घालू, आई-वडिलांनाही दिल्या धमक्या...
मोठी बातमी! भाजपमध्ये या, नाहीतर गोळ्या घालू, आई-वडिलांनाही दिल्या धमक्या...अभिजीत दीपकेच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
भाजप नेता 25-30 वर्षांपासून दारुच्या धंद्यात, दारुमाफिया म्हणून...
भाजप नेता 25-30 वर्षांपासून दारुच्या धंद्यात, दारुमाफिया म्हणून... एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
मोठी बातमी! अखेर अभिजीत दीपके विदेशी फंडींगबाबत व्यक्त, थेट...
मोठी बातमी! अखेर अभिजीत दीपके विदेशी फंडींगबाबत व्यक्त, थेट अमित शाहांचं नाव घेत हल्ला
हे कुठले झाले आमच्या पक्षाचे मालक? शिंदेंसोबतचा प्रत्येक माणूस अपात्र
Sanjay Raut Uncut | हे कुठले झाले आमच्या पक्षाचे मालक? शिंदेंसोबतचा प्रत्येक माणूस अपात्र ठरेल; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी राऊतांची स्फोटक प्रतिक्रिया
Gen-Z ने जंतर-मंतरवर येऊन फक्त भारताला... रामदेव बाबांचा आरोप
Gen-Z ने जंतर-मंतरवर येऊन फक्त भारताला... रामदेव बाबांच्या धक्कादायक आरोपांनी खळबळ
कॅप नं. 278 म्हणत अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला भावनिक निरोप
मोठी बातमी! कॅप नं. 278 म्हणत अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला भावनिक निरोप; व्हिडिओ शेअर करत केली घोषणा
गृहमंत्री अमित शहांनी गोळीबाराचे आदेश दिले असो की नसो दोषी तेच, कारण..
गृहमंत्री अमित शहांनी गोळीबाराचे आदेश दिले असो की नसो दोषी तेच, कारण.... बड्या नेत्याच्या विधानानं खळबळ
तुकाराम मुंढेंविरोधात तब्बल 29 कर्मचाऱ्यांचा एल्गार...
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंविरोधात तब्बल 29 कर्मचाऱ्यांचा एल्गार; थेट मंत्र्यांकडे घेतली धाव