AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team india : कष्टाचं फळ मिळालंच! 21 वर्षाच्या पोराची टीम इंडियाच्या कसोटी आणि टी-20 संघामध्ये निवड

21 वर्षाच्या युवा खेळाडूच्या कष्टाचं फळ मिळालं आहे. टीम इंडियाच्या कसोटी आणि टी-20 संघात या तरण्या पोराची निवड झाली आहे. आयपीएल गाजवल्यानंतर या खेळाडूचं नशीब फळफळलं आहे.

Team india : कष्टाचं फळ मिळालंच! 21 वर्षाच्या पोराची टीम इंडियाच्या कसोटी आणि टी-20 संघामध्ये निवड
वनडे वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी निवडलेले बहुतांश खेळाडू विश्वचषक संघात दिसणार आहेत, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.
| Updated on: Jul 06, 2023 | 4:22 PM
Share

मुंबई : बीसीसीआयने वेस्ट इंडिज विरूद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने या संघामध्ये युवा खेळाडूंना संधी दिली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. जाहीर झालेल्या संघामध्ये 21 वर्षाच्या युवा खेळाडूच्या कष्टाचं फळ मिळालं आहे. टीम इंडियाच्या कसोटी आणि टी-20 संघात या तरण्या पोराची निवड झाली आहे. आयपीएल गाजवल्यानंतर या खेळाडूचं नशीब फळफळलं आहे.

कोण आहे हा खेळाडू?

टीम इंडियाच्या कसोटी आणि टी-20 मध्ये संघामध्ये निवड झालेला हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून यशस्वी जयस्वाल आहे. वयाच्या 21 वर्षी टीम इंडियाच्या कसोटी आणि संघात निवड होणं म्हणजे खायची गोष्ट नाही. पठ्ठ्याच्या मेहनतीला यश आलं असून काही दिवसात टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे.

या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह इतरांचा समावेश आहे.  त्यामुळे हार्दिक पंड्या विंडिज विरुद्धच्या या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर मुंबईकर सूर्यकुमार यादव याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच यशस्वी जयस्वाल आणि तिलक वर्मा या दोघांची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड करण्यात आली आहे.

टीम इंडिया टी-20 संघ : इशान किशन (W), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्य कुमार यादव (VC), संजू सॅमसन (W), हार्दिक पांड्या (C), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.

विंडिज विरुद्ध टीम इंडिया टी 20 सीरिज वेळापत्रक

पहिला सामना, 3 ऑगस्ट.

दुसरा सामना, 6 ऑगस्ट.

तिसरा सामना, 8 ऑगस्ट.

चौथा सामना, 12 ऑगस्ट.

पाचवा सामना – 13 ऑगस्ट.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.