AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत भारताला असं करणं परवडणारं नाही, जाणून घ्या त्या मागचं कारण

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. भारत या मालिकेत दोन सामने खेळणार आहे. या मालिकेकतील विजय भारताला खूपच महत्त्वाचा आहे. जाणून घ्या त्यामागचं कारण

IND vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत भारताला असं करणं परवडणारं नाही, जाणून घ्या त्या मागचं कारण
IND vs WI: वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतील तशी चूक भारताला पडणार महागात, कारण...
| Updated on: Jul 12, 2023 | 6:26 PM
Share

मुंबई : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून या मालिकेतील विजयाला खूपच महत्त्व आहे. कारण या मालिकेपासून वर्ल्ड टेस्ट चॅमप्यिनशिपच्या साखळीला सुरुवात होणार आहे. या मालिकेत टीम इंडिया भविष्याच्या दृष्टीकोनातून काही प्रयोगांसह उतरणार आहे. वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या तुलनेत दुबळा मानला जात आहे. मात्र विजय मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही. ही मालिका जिंकणं भारतासाठी खूपच महत्त्वाचं आहे. कारण यानंतर भारताला इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या तगड्या संघांशी दोन हात करायचे आहेत.

वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी विजय का महत्त्वाचा

भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतून सुरुवात करत आहे. या मालिकेत भारतीय संघात मोठे बदल करण्यात आलं आहे. या मालिकेतील खेळाडूंच्या कामगिरीवर भवितव्य अवलंबून असणार आहे. काही खेळाडूंचं वय पाहता त्यांना येत्या मालिकांमधून वगळण्याची शक्यता आहे. तर नवोदित खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न असणार आहे.

भारतसमोरील आव्हानं

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर या वर्षाच्या शेवटी टीम इंडिया दोन कसोटी मालिकांसाठी दक्षिण आफ्रिकेत जाणार आहे. त्यानंतर इंग्लंडचा संघ पाच कसोटी सामन्यांसाठी भारतात येणार आहे. त्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये बांगलादेशचा संघ भारतात येईल. न्यूझीलंडसोबत तीन सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. सर्वात शेवटी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रेकॉर्ड

  • भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकूण 98 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यात 30 सामने वेस्ट इंडिजने, तर 22 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. 46 सामने अनिर्णित ठरले आहेत.
  • कॅरेबियन धरतीवर दोन्ही संघ 51 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात 16 वेळा वेस्ट इंडिजने, तर 9 वेळा टीम इंडियाने विजय मिळवला आहे. 26 सामने अनिर्णित ठरले आहेत.
  • 21 व्या शतकात भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध 28 कसोटी सामने खेळले. त्यात भारताने 15 जिंकले असून दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.
  • मागच्या 5 कसोटी सामन्यांच्या निकालाबाबत सांगायचं तर भारताने 4 सामने मोठ्या फरकाने जिंकले आहेत. तर एक सामना ड्रॉ राहिला आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, इशान किशन, श्रीकर भरत, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर.

Follow Us
पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर प्रकरणावरून...
Delhi | पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर दानपेटी प्रकरणावरून दिल्लीत राजकीय रणकंदन
खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pune | खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
FDA ला हायकोर्टाचा दणका! 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
FDA ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयाच्या कँटीनमध्ये माश्या, धूळ; 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण...
Bhiwandi Building collapsed | भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण अजुनही ढिगाऱ्याखाली
लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
Rupali Thombare Patil | लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; चिमुकल्यांकडून पाय धुऊन घेतल्याप्रकरणी ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! दीपकेंचा आरोप
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन!
Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...