AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियात पहिल्या दोन सामन्यांसाठी असा बदल, काय झालं वाचा

टी20 वर्ल्डकप जेतेपदानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या संघाचं नेतृत्व शुबमन गिलच्या खांद्यावर देण्यात आलं आहे. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात मोठा बदल करण्यात आला आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या.

IND vs ZIM: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियात पहिल्या दोन सामन्यांसाठी असा बदल, काय झालं वाचा
| Updated on: Jul 02, 2024 | 3:01 PM
Share

भारत विरुद्ध झिम्बाब्वे पाच सामन्यांची टी20 मालिका आहे. ही मालिका 6 जुलैपासून सुरु होणार आहे. 14 जुलैपर्यंत ही पाच सामन्यांची मालिका असणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर देण्यात आली आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर करण्यात आली आहे. मात्र पहिल्या दोन सामन्यांसाठी आता काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांना पहिल्या दोन टी20 मालिकेसाठी संघात घेतलं आहे. या तिघांना संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांच्या बदल्यात घेतल आहे. हे तिघंही टी20 वर्ल्डकप संघातील खेळाडू असून त्यांना पहिल्या दोन सामन्यांसाठी आराम देण्यात आला आहे. भारतीय संघ अजूनही बारबाडोसमधून भारतात परतला नाही. तिथल्या वादळी स्थितीमुळे विमानतळ बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे या तिघांना मायदेशी परतल्यानंतर हवा तसा आराम मिळणार नाही. याचाच विचार करून बीसीसीआयने या तिघांच्या जागी पहिल्या दोन सामन्यांसाठी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांची निवड केली आहे.

झिम्बाब्वे विरुद्ध पहिला सामना 6 जुलै आणि दुसरा सामना 7 जुलैला होणार आहे. त्यानंतर तिसरा सामना 10 जुलैला होणार आहे. तिसऱ्या सामन्यापूर्वी संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे हरारे येथे पोहोचतील असं बीसीसीआयने आपल्या निवेदनात सांगितलं आहे. साई सुदर्शन, हार्षित राणा यांनी आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. त्याच आधारावर या तिघांची निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे, रिंकु सिंग आणि खलील अहमद हे देखील वर्ल्डकप विजेत्या संघासोबत आहेत. हे दोघंही राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियासोबत होते. पण त्यांना काही संघात जागा मिळाली नाही.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या टी -20 सामन्यासाठी भारताचा संघ : शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार , तुषार देशपांडे, साई सुधारसन, जितेश शर्मा (विकेटकीपर), हर्षित राणा

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.