AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने मालिका गमवल्यानंर WTC गुणतालिकेत उलथापालथ, पहिलं स्थान तर गमावलं आता…

भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धची मालिका सहज जिंकेल असं वाटत होतं. पण सर्वच भ्रमनिरास झाला. घड्याळाचे काटे उलटे फिरले आणि न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लिन स्वीप दिला. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत उलथापालथ झाली आहे.

भारताने मालिका गमवल्यानंर WTC गुणतालिकेत उलथापालथ, पहिलं स्थान तर गमावलं आता...
Image Credit source: Twitter
| Updated on: Nov 03, 2024 | 3:23 PM
Share

न्यूझीलंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 25 धावांनी मात देत मालिका 3-0 ने जिंकली. या मालिकेपूर्वी भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित एकदम सोपं दिसत होतं. भारत सहज अंतिम फेरी गाठेल असं सांगितलं जात होतं. पण या मालिकेत सर्वच फासे उलटे पडले. न्यूझीलंडने भारतीय संघाला असा फिरवला की उठण्याची संधीच दिली आहे. या मालिकेत भारताच्या फलंदाजीचे चिंध्या उडाल्या. एखाद दुसरा फलंदाज खेळून जात होता. पण त्यांच्या कामगिरीतही सातत्य नसल्याचं दिसून आलं. विराट रोहितसारखे दिग्गज फलंदाज तर न्यूझीलंडसमोर नांगी टाकून गेले. यापूर्वी दक्षिण अफ्रिकेने 2000 साली भारताला क्लिन स्वीप दिला होता. आता जवळपास 24 वर्षांनी न्यूझीलंडने भारताला व्हाईटवॉश दिला आहे. भारताने ही मालिका गमवून बरेच नकोसे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतही फटका बसला आहे. भारताला गुणतालिकेतील पहिलं स्थान गमवावं लागलं आहे. तसेच अंतिम फेरीत स्थान मिळवण्याचं गणितही किचकट झालं आहे.

भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत एकूण 14 सामने खेळले असून त्यापैकी 8 सामन्यात विजय, तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर एक सामना ड्रॉ झाला आहे. यामुळे भारताची विजयी टक्केवारी 58.33 इतकी झाली आहे. त्यामुळे गुणतालिकेतील पहिलं स्थान गमवावं लागलं आहे. भारताने मालिका गमवल्याने ऑस्ट्रेलियाला फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी ही 62.50 इतकी असून पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे अंतिम फेरीचं भारताचं स्वप्न लांबलं आहे. भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.

न्यूझीलंडने भारताला पराभूत केल्याने पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. न्यूझीलंडने 11 पैकी 6 सामन्यात विजय आणि 5 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी 54.55 टक्के झाली आहे. तर श्रीलंकेची विजयी टक्केवारी ही 55.56 इतकी असून तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण अफ्रिकेची विजयी टक्केवारी ही 54.17 असून पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, श्रीलंका आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात चुरस आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.