AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने मालिका गमवल्यानंर WTC गुणतालिकेत उलथापालथ, पहिलं स्थान तर गमावलं आता…

भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धची मालिका सहज जिंकेल असं वाटत होतं. पण सर्वच भ्रमनिरास झाला. घड्याळाचे काटे उलटे फिरले आणि न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लिन स्वीप दिला. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत उलथापालथ झाली आहे.

भारताने मालिका गमवल्यानंर WTC गुणतालिकेत उलथापालथ, पहिलं स्थान तर गमावलं आता...
Image Credit source: Twitter
| Updated on: Nov 03, 2024 | 3:23 PM
Share

न्यूझीलंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 25 धावांनी मात देत मालिका 3-0 ने जिंकली. या मालिकेपूर्वी भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित एकदम सोपं दिसत होतं. भारत सहज अंतिम फेरी गाठेल असं सांगितलं जात होतं. पण या मालिकेत सर्वच फासे उलटे पडले. न्यूझीलंडने भारतीय संघाला असा फिरवला की उठण्याची संधीच दिली आहे. या मालिकेत भारताच्या फलंदाजीचे चिंध्या उडाल्या. एखाद दुसरा फलंदाज खेळून जात होता. पण त्यांच्या कामगिरीतही सातत्य नसल्याचं दिसून आलं. विराट रोहितसारखे दिग्गज फलंदाज तर न्यूझीलंडसमोर नांगी टाकून गेले. यापूर्वी दक्षिण अफ्रिकेने 2000 साली भारताला क्लिन स्वीप दिला होता. आता जवळपास 24 वर्षांनी न्यूझीलंडने भारताला व्हाईटवॉश दिला आहे. भारताने ही मालिका गमवून बरेच नकोसे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतही फटका बसला आहे. भारताला गुणतालिकेतील पहिलं स्थान गमवावं लागलं आहे. तसेच अंतिम फेरीत स्थान मिळवण्याचं गणितही किचकट झालं आहे.

भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत एकूण 14 सामने खेळले असून त्यापैकी 8 सामन्यात विजय, तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर एक सामना ड्रॉ झाला आहे. यामुळे भारताची विजयी टक्केवारी 58.33 इतकी झाली आहे. त्यामुळे गुणतालिकेतील पहिलं स्थान गमवावं लागलं आहे. भारताने मालिका गमवल्याने ऑस्ट्रेलियाला फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी ही 62.50 इतकी असून पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे अंतिम फेरीचं भारताचं स्वप्न लांबलं आहे. भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.

न्यूझीलंडने भारताला पराभूत केल्याने पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. न्यूझीलंडने 11 पैकी 6 सामन्यात विजय आणि 5 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी 54.55 टक्के झाली आहे. तर श्रीलंकेची विजयी टक्केवारी ही 55.56 इतकी असून तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण अफ्रिकेची विजयी टक्केवारी ही 54.17 असून पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, श्रीलंका आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात चुरस आहे.

हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.