AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-पाकिस्तान एकाच दिवशी खेळणार कसोटी, WTC 2025 गुणातालिकेत होणार उलथापालथ

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या दृष्टीने बॉक्सिंग कसोटी सामना खूपच महत्वाचा आहे. एकाच दिवशी भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ कसोटी खेळणार आहे. या सामन्यांचा निकाल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर पडणार आहे. इतकंच काय अंतिम फेरीचं गणित सोडवणार आहे.

भारत-पाकिस्तान एकाच दिवशी खेळणार कसोटी, WTC 2025 गुणातालिकेत होणार उलथापालथ
| Updated on: Dec 25, 2024 | 4:26 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेच्या साखळी फेरीचे सामने अंतिम टप्प्यात आहेत. आता अंतिम फेरीच्या शर्यतीत भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आहेत. तर श्रीलंकेला काठावरची संधी आहे. असं असताना 26 डिसेंबरला भारत आणि पाकिस्तान हे कसोटी सामना खेळणार आहेत. हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर प्रभाव टाकणार आहे. भारताला विजय खूपच महत्त्वाचा आहे. तर पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. मात्र त्यांच्या विजयाने गुणतालिकेत मोठा उलटफेर होऊ शकतो. बॉक्सिंग डे कसोटीत भारत-ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान-दक्षिण अफ्रिका यांच्यात सामना होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 26 डिसेंबरला सकाळी 5 वाज सामना सुरु होणार आहे. साडे चार वाजता नाणेफेकीचा कौल होईल. या सामन्याचा दिवस दुपारी 12 वाजेपर्यंत संपणार आहे.

पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात त्यानंतर कसोटी सामना सुरु होईल. पाकिस्तानचा संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. पहिल्यांदा टी20 मालिकेत, त्यानंतर वनडे मालिकेत दक्षिण अफ्रिकेला व्हाईटवॉश दिला आहे. त्यामुळे पाकिस्तान कसोटी सामन्यातही उलथापालथ करू शकते. जर पाकिस्तानने दोन्ही कसोटीत दक्षिण अफ्रिकेला पराभूत केलं तर अंतिम फेरीचं स्वप्न भंगू शकते. दुसरीकडे, श्रीलंकेला काठावरची संधी मिळण्याची शक्यता आहे.

वर्ल्ड टेस्ट गुणतालिकेत दक्षिण अफ्रिकेचा संघ टॉपला आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाण्याऱ्या दोन पैकी एका कसोटी सामन्यात विजय मिळवला की अंतिम फेरीतील स्थान पक्कं होणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताविरुद्ध दोन्ही सामने जिंकावेच लागणार आहेत. तिसऱ्या स्थानावर भारतीय संघ आहे. भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकावेच लागतील.

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील तीन सामने झाले असून 1-1 ने बरोबरी आहे. पहिला कसोटी सामना भारताने जिंकला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने डे नाईट कसोटीत पुनरागमन करत सामना खिशात घालत बरोबरी केली. तर तिसरा कसोटी सामना बरोबरीत सुटला.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.