AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: काल जंगी सेलिब्रेशन, आज वाँडरर्सवर टीम इंडियाने गाळला घाम

जोहान्सबर्ग: काल न्यू इयरच जंगी सेलिब्रेशन केल्यानंतर टीम इंडियाने आज जोहान्बर्गच्या वाँडरर्स स्टेडियममवर घाम गाळला. सोमवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी खेळाडूंनी जोरदार तयारी केली. सध्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. सेंच्युरियनवर भारताने ऐतिहासिक कसोटी विजयाची नोंद केली. सेंच्युरियनवर कसोटी जिंकणारा भारत पहिला आशियाई संघ ठरला. 29 वर्षानंतर दक्षिण […]

IND vs SA: काल जंगी सेलिब्रेशन, आज वाँडरर्सवर टीम इंडियाने गाळला घाम
(Courtesy: bcci.tv screenshot)
| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 5:40 PM
Share

जोहान्सबर्ग: काल न्यू इयरच जंगी सेलिब्रेशन केल्यानंतर टीम इंडियाने आज जोहान्बर्गच्या वाँडरर्स स्टेडियममवर घाम गाळला. सोमवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी खेळाडूंनी जोरदार तयारी केली. सध्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. सेंच्युरियनवर भारताने ऐतिहासिक कसोटी विजयाची नोंद केली. सेंच्युरियनवर कसोटी जिंकणारा भारत पहिला आशियाई संघ ठरला. 29 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेत मालिका विजयाच्या इराद्याने टीम इंडिया खेळत आहे. (Ind vs SA India reach Johannesburg sweat it out at the Wanderers ahead of 2nd Test)

ऐतिहासिक मालिका विजयापासून एक पाऊल दूर 

बीसीसीआयने शनिवारी टीम इंडियाच्या वाँडरर्स स्टेडियमवरील ट्रेनिंगचा व्हिडिओ पोस्ट केला. पहिली कसोटी 113 धावांनी जिंकून टीम इंडियाने मालिकेत दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर ढकललं आहे. भारत ऐतिहासिक कसोटी मालिका विजयापासून आता फक्त एक पाऊल दूर आहे.

विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने भारताच्या वेगवान गोलंदाजांचे कौतुक केले होते. मोहम्मद शामी जगातील तीन सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक असल्याचे विराटने म्हटले होते. सेंच्युरियन कसोटीत शामीने आठ विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने दोन्ही डावात मिळून अनुक्रमे पाच आणि तीन विकेट घेतल्या. ‘वर्ल्ड क्लास’ अशा शब्दात सामन्यानंतर प्रेझेंटेशन सोहळ्याच्यावेळी विराटने शामीचे कौतुक केले होते.

वाँडरर्सवर भारत-दक्षिण आफ्रिका शेवटच्या सामन्याचा निकाल काय लागला होता 

भारताने वाँडरर्स स्टेडियममवर खेळलेला शेवटचा कसोटी सामना 63 धावांनी जिंकला होता. विराट कोहलीने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले होते तर दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेने चांगली खेळी केली होती. दुसऱ्या डावात शामीने बॉलने कमाल दाखवली होती. त्याने पाच विकेट घेतल्या होत्या. भारताच्या 241 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 177 धावात ऑलआऊट झाला होता.

संबंधित बातम्या:

IND vs SA: रोहित शर्मानंतर पुढचा कॅप्टन कोण? निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मांनी दिलं उत्तर टीम इंडियाचं दक्षिण आफ्रिकेत 31st चं जंगी सेलिब्रेशन पाहा खास PHOTOS Ravi Shastri| ‘चालू दे तुमचं’, रवी शास्त्रींनी सांगितला पंत-गिल बरोबरचा शौचालयातला ‘तो’ किस्सा

(Ind vs SA India reach Johannesburg sweat it out at the Wanderers ahead of 2nd Test)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.