AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: काल जंगी सेलिब्रेशन, आज वाँडरर्सवर टीम इंडियाने गाळला घाम

जोहान्सबर्ग: काल न्यू इयरच जंगी सेलिब्रेशन केल्यानंतर टीम इंडियाने आज जोहान्बर्गच्या वाँडरर्स स्टेडियममवर घाम गाळला. सोमवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी खेळाडूंनी जोरदार तयारी केली. सध्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. सेंच्युरियनवर भारताने ऐतिहासिक कसोटी विजयाची नोंद केली. सेंच्युरियनवर कसोटी जिंकणारा भारत पहिला आशियाई संघ ठरला. 29 वर्षानंतर दक्षिण […]

IND vs SA: काल जंगी सेलिब्रेशन, आज वाँडरर्सवर टीम इंडियाने गाळला घाम
(Courtesy: bcci.tv screenshot)
| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 5:40 PM
Share

जोहान्सबर्ग: काल न्यू इयरच जंगी सेलिब्रेशन केल्यानंतर टीम इंडियाने आज जोहान्बर्गच्या वाँडरर्स स्टेडियममवर घाम गाळला. सोमवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी खेळाडूंनी जोरदार तयारी केली. सध्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. सेंच्युरियनवर भारताने ऐतिहासिक कसोटी विजयाची नोंद केली. सेंच्युरियनवर कसोटी जिंकणारा भारत पहिला आशियाई संघ ठरला. 29 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेत मालिका विजयाच्या इराद्याने टीम इंडिया खेळत आहे. (Ind vs SA India reach Johannesburg sweat it out at the Wanderers ahead of 2nd Test)

ऐतिहासिक मालिका विजयापासून एक पाऊल दूर 

बीसीसीआयने शनिवारी टीम इंडियाच्या वाँडरर्स स्टेडियमवरील ट्रेनिंगचा व्हिडिओ पोस्ट केला. पहिली कसोटी 113 धावांनी जिंकून टीम इंडियाने मालिकेत दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर ढकललं आहे. भारत ऐतिहासिक कसोटी मालिका विजयापासून आता फक्त एक पाऊल दूर आहे.

विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने भारताच्या वेगवान गोलंदाजांचे कौतुक केले होते. मोहम्मद शामी जगातील तीन सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक असल्याचे विराटने म्हटले होते. सेंच्युरियन कसोटीत शामीने आठ विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने दोन्ही डावात मिळून अनुक्रमे पाच आणि तीन विकेट घेतल्या. ‘वर्ल्ड क्लास’ अशा शब्दात सामन्यानंतर प्रेझेंटेशन सोहळ्याच्यावेळी विराटने शामीचे कौतुक केले होते.

वाँडरर्सवर भारत-दक्षिण आफ्रिका शेवटच्या सामन्याचा निकाल काय लागला होता 

भारताने वाँडरर्स स्टेडियममवर खेळलेला शेवटचा कसोटी सामना 63 धावांनी जिंकला होता. विराट कोहलीने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले होते तर दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेने चांगली खेळी केली होती. दुसऱ्या डावात शामीने बॉलने कमाल दाखवली होती. त्याने पाच विकेट घेतल्या होत्या. भारताच्या 241 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 177 धावात ऑलआऊट झाला होता.

संबंधित बातम्या:

IND vs SA: रोहित शर्मानंतर पुढचा कॅप्टन कोण? निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मांनी दिलं उत्तर टीम इंडियाचं दक्षिण आफ्रिकेत 31st चं जंगी सेलिब्रेशन पाहा खास PHOTOS Ravi Shastri| ‘चालू दे तुमचं’, रवी शास्त्रींनी सांगितला पंत-गिल बरोबरचा शौचालयातला ‘तो’ किस्सा

(Ind vs SA India reach Johannesburg sweat it out at the Wanderers ahead of 2nd Test)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली