India tour of South Africa: स्फोटक प्रेस कॉन्फरन्सनंतर विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना

कॅमेऱ्यासमोर पोझ देताना जसप्रीत बुमराहच्या चेहऱ्यावर हास्य होते, तर चेतेश्वर पुजारा, शार्दुल ठाकूर आणि मयांक अग्रवाल यांनी चेहऱ्यावर मास्क घातले होते. बोर्डाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव दिसत आहेत.

India tour of South Africa: स्फोटक प्रेस कॉन्फरन्सनंतर विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना
भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 11:05 AM

मुंबई: कर्णधार विराट कोहलीच्या (Virat kohli) कालच्या स्फोटक पत्रकार परिषदेनंतर आज सकाळी भारतीय संघ मुंबईहून विशेष चार्टड विमानाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa tour) रवाना झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने (BCCI) विमानात बसलेल्या खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ तीन कसोटी, तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. कसोटी मालिकेला बॉक्सिंग डे च्या दिवशी २६ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे.

कॅमेऱ्यासमोर पोझ देताना जसप्रीत बुमराहच्या चेहऱ्यावर हास्य होते, तर चेतेश्वर पुजारा, शार्दुल ठाकूर आणि मयांक अग्रवाल यांनी चेहऱ्यावर मास्क घातले होते. बोर्डाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव दिसत आहेत.

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विराट कोहली १८ सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी नव्याने निवड झालेल्या रोहित शर्माची अनुपस्थिती संघाला प्रकर्षाने जाणवेल. दुखातपतीमुळे रोहित शर्मा या कसोटी मालिकेत खेळणार नाहीय. मुंबईत सरावा दरम्यान रोहित शर्माला दुखापत झाली होती. रोहितसह रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल हे दोन प्रमुख डावखुरे गोलंदाजही या मालिकेत खेळणार नाहीयत.

BCCI ला बाजू मांडावी लागली होती

कालची विराट कोहलीची पत्रकार परिषद वादग्रस्त ठरली होती. विराटच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच बीसीसीआयला समोर येऊन आपली बाजू मांडावी लागली होती. विराटने थेट बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीशी पंगा घेतला आहे. टी-20 चे कर्णधारपद सोडणाऱ्या विराटने वनडे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण वनडे संघाच्या कर्णधारपदावरुन हटवताना बीसीसीआयने आपल्याशी व्यवस्थित संवाद ठेवला नाही, असा दावा काल विराटने केला होता.

भारतीय टेस्ट टीम– विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा , मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, प्रियांक पांचाल. स्टँड बाय खेळाडू : नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चाहर, अरजान नागवासवाला

संबंधित बातम्या: विराट आणि सौरव गांगुलीमध्ये नेमकं खरं कोण बोलतय? कॉमेट्री बॉक्समध्ये ईशा गुहाच्या डबल मीनिंग गुगलीवर गिलख्रिस्ट क्लीन बोल्ड Virat kohli press confrence: ‘रोहित आणि माझ्यात कुठलाही प्रॉब्लेम नाही, हे वारंवार सांगून आता मी थकलोय’

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.