AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी रोहित शर्माबाबत मोठी अपडेट! नक्की काय?

Rohit Sharma Team India: टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याची 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात टी20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. त्याआधी रोहित शर्माबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

IND vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी रोहित शर्माबाबत मोठी अपडेट! नक्की काय?
rohit sharma team india
| Updated on: Jul 17, 2024 | 5:08 PM
Share

रोहित शर्मा याने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला आयसीसी टी 20 वर्ल्ड कप जिंकून दिला. त्यानंतर रोहित, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांनी टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडच्या झिंबाब्वे दौऱ्यानंतर सिनिअर टीम श्रीलंका दौऱ्यासाठी सज्ज आहे. उभयसंघात या दौऱ्यात टी 20 आणि वनडे सीरिज होणार आहे. रोहितसाठी या दौऱ्यात वनडे सीरिजचाच एकमेव पर्याय आहे, कारण त्याने टी 20 मधून निवृत्ती घेतली आहे. रोहित या वनडे सीरिजमध्ये खेळणार नसल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता रोहितबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

क्रिकबझच्या रिपोर्ट्नुसार, रोहित श्रीलंका विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी उपलब्ध असेल. बीसीसीआय निवड समिती लवकरच श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. त्यामुळे जर रोहित वनडे सीरिज खेळणार असेल, तर त्यालाच नेतृत्वाची जबाबदारी मिळू शकते. गौतम गंभीर हेड कोच म्हणून श्रीलंका दौऱ्यापासून सूत्रं सांभाळणार आहे. त्याआधी गंभीरने अनुभवी खेळाडूंनी वनडे सीरिजमध्ये खेळावं, असं आवाहन केलं होतं. त्यानंतर रोहितबाबतची मोठी अपडेट आली आहे. तसेच श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या दोघांचंही वनडे सीरिजमधून टीम इंडियात कमबॅक होण्याची शक्यता आहे.

बुमराह-विराटला विश्रांती!

येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी टीम इंडियाकडे मोजकेच एकदिवसीय सामने आहेत. त्यामुळेच रोहित श्रीलंके विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी स्वत:ला निवडीसाठी उपलब्ध केल्याचीही शक्यता आहे. मात्र विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या दोघांना एकदिवसीय मालिकेतून विश्रांती दिली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या दोघांचं पुनरागमन होण्याची शक्यता अधिक आहे. टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याला 27 जुलैपासून टी 20 मालिकेने सुरुवात होणार आहे. तर त्यानंतर वनडे सीरिज पार पडणार आहे. दोन्ही मालिका 3-3 सामन्यांच्या आहेत.

रोहित शर्मा वनडे सीरिजसाठी उपलब्ध!

दरम्यान रोहितच्या निवृत्तीनंतर आता टी 20 मध्ये टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी कुणाला मिळणार? अशीही चर्चा आहे. कर्णधारपदासाठी सूर्यकुमार यादव याचं नाव आघाडीवर आहे. हार्दिक पंड्याच्या नावाचीही चर्चा आहे. मात्र सूर्या कॅप्टन्सीसाठी प्रबळ दावेदार आहे. आता कर्णधारपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Follow Us
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... मोठी खळबळ
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट...
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप:
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा
संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
नाशिकमधील खड्डे पाहणीदरम्यान संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?