Vaibhav Suryavanshi: साहेबांच्या देशात वैभव सूर्यवंशीचा लवकरच धमाका? अभिषेक, संजू आणि किशनसोबत मैदानात उतरणार? ते दोन पर्याय काय?

Vaibhav Suryavanshi in India Playing 11: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी साहेबांच्या देशात खेळण्याची दाट शक्यता आहे. आयर्लंडविरोधातील सामन्यात त्याला संधी देण्यात आली नसली तरी इंग्लंडमधील मैदानात त्याची बॅट तळपण्याची शक्यता आहे. IPL 2026 मध्ये त्याने 776 धावा चोपल्या होत्या. आता गोऱ्या साहेबांना तो कसा लोळवतो याकडे क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.

Vaibhav Suryavanshi: साहेबांच्या देशात वैभव सूर्यवंशीचा लवकरच धमाका? अभिषेक, संजू आणि किशनसोबत मैदानात उतरणार? ते दोन पर्याय काय?
वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौरा
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 30, 2026 | 10:48 AM

Vaibhav Suryavanshi in India Playing 11: आयर्लंडमध्ये टीम इंडियाचे पानीपत झाले. भारतीय संघाला 0-2 असे झोपवण्यात आले. त्यामुळे टीम इंडियासमोर इंग्लंड संघाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. 1 जुलैपासून 5 सामन्यांची टी20 मालिका होत आहे. आयर्लंडमधील सुपर फ्लॉप शोनंतर टीम इंडियात मोठा फेरबदलाची चर्चा सुरू आहे. ड्रेसिंग रुममध्ये वैभव सूर्यवंशीविषयी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. आयर्लंडमध्ये पहिल्या फळीने सपशेल हाराकिरी केली होती. त्यानंतर सुनिल गावस्कर यांच्यासह चाहत्यांनी वैभव सूर्यवंशी याला टीम इंडियात संधी देण्याची वकिली केली आहे.

तर दुसरीकडे भारतीय संघाचे सहाय्यक कोच रायन टेन डोशेट यांनी वेगळा सूर आळवला. खेळाडूंना पूर्ण वेळ देण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला. वैभवला मैदानात उतरण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल असा त्यांचा काहीसा सूर आहे. पण जर कर्णधार श्रेयस अय्यर याने निर्णय घेतला तर वैभव सूर्यवंशी याला संघात संधी मिळू शकते. धडाकेबाज संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मासारखे दमदार खेळाडूंसोबत वैभव असल्यास काही चमत्कार होऊ शकतो.

काय आहेत पर्याय?

जर टीम इंडिया दोन्ही सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांना कायम ठेवते आणि वैभव सूर्यवंशीला तिसऱ्या क्रमांकावर संधी देते तर बदल दिसू शतको. वैभव सध्या कोणत्याही दबावाखाली नाही. तो इंग्लंडच्या गोलंदाजाला धुवून काढू शकतो. तो तिसऱ्या क्रमांकावर आक्रमक खेळी खेळून संघाला एका मजबूत स्थितीत आणू शकतो. त्यामुळे त्याला तिसरा खेळाडू म्हणून मैदानात पाठवण्याची इच्छा चाहते व्यक्त करत आहेत. यामुळे ईशान किशन चौथ्या तर कर्णधार श्रेयस अय्यर पाचव्या क्रमांकावर जातील. पुढे तिलक वर्मा, शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांचा क्रमांक येईल. इंग्लंडच्या खेळपट्टीवर हा बदल फायदेशीर ठरू शकतो.

दुसरा एक पर्याय आहे. त्यात वैभव सूर्यवंशीला तिसऱ्या क्रमांकावर उतरवल्यास आणि संकटमोचक तिलक वर्माला याला दोन सामन्यात विश्रांती दिल्यास वैभवला संधी मिळेल आणि संघाला नवीन खेळाडू गवसता येईल. पण हा धोका संघ आणि कर्णधार अय्यर पत्करतील का हा मोठा प्रश्न आहे. कारण टी20साठी अनुभवी खेळाडूंची गरज आहे. आयर्लंड विरोधातील हाराकिरीने संघाचे मनोबल वाढवणे आवश्यक आहे.

इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडिया

अभिषेक शर्मा, संजू सैमसन (यष्टीरक्षक), वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, प्रिंस यादव.

Follow Us