IND vs NZ : अवघ्या 62 धावांत न्यूझीलंडचा खुर्दा, पाहुण्यांच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

भारताला 325 धावांत रोखल्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडची अवस्था खूपच वाईट झाली आहे. भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 62 धावांमध्ये न्यूझीलंडचा डाव गुंडाळला आहे.

IND vs NZ : अवघ्या 62 धावांत न्यूझीलंडचा खुर्दा, पाहुण्यांच्या नावावर लाजिरवाणा विक्रम
Indian Cricket Team
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 4:52 PM

मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. कालच्या 4 बाद 221 वरुन पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाला एकट्या एजाज पटेलने लोळवलं. काल मयंक अग्रवाल 120 धावांवर नाबाद होता त्याने आज 30 धावांचं योगदान दिलं. मयंक 150 धावांवर असताना एजाज पटेलचा बळी ठरला. आज अक्षर पटेलने अर्धशतकी खेळी करत अखेरच्या षटकांमध्ये भारताला 300 पार नेलं. मात्र त्यालादेखील एजाजनेच पायचित केलं. दरम्यान, भारताचा डाव 325 धावांवर संपुष्टात आला आहे. मयंक आणि अक्षरव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. काल सलामीवीर शुभमन गिलने 44 धावांचं योगदान दिलं होतं. दरम्यान, भारताचे 3 फलंदाज भोपळ्यावर परतले आहेत. त्यामध्ये चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि रवीचंद्रन अश्विन या तिघांचा समावेश आहे. एजाज पटेलने एकट्याने भारताचे सर्व फलंदाज बाद केले. (India vs New Zealand : NZ unwanted record, all out at 62 runs, Ravichandran Ashwin Brilliance, Virat kohli shines as captain)

दरम्यान, भारताला 325 धावांत रोखल्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडची अवस्था खूपच वाईट झाली आहे. भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 62 धावांमध्ये न्यूझीलंडचा डाव गुंडाळला आहे. न्यूझीलंडकडून काईल जेमिनसनने सर्वाधिक 17 धावांचं योगदान दिलं. सलामीवीर टॉम लॅथमला 10 धावा जोडता आल्या. या दोघांपैकी कोणत्याही किवी फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. न्यूझीलंडचे 3 फलंदाज भोपळ्यावर माघारी परतले. दरम्यान, भारताकडून रवीचंद्नन अश्विनने सर्वात किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने 8 षटकात 8 धावा देत 4 बळी घेतले. तर मोहम्मद सिराज भारताचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकात 19 धावा देत 3 बळी घेतले. तसेच अक्षर पटेलला 2 आणि जयंत यादवला एक विकेट मिळवता आली.

लाजिरवाणा विक्रम

न्यूझीलंडचा संघ आज अवघ्या 62 धावांत गारद झाला. न्यूझीलंडच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील ही सहावी नीचांकी धावसंख्या आहे. त्याच वेळी, कोणत्याही आशियाई संघाविरुद्ध 62 धावा ही न्यूझीलंडची सर्वात खराब कामगिरी आहे.

कर्णधार विराट कोहलीचा जलवा

विराट कोहली कर्णधार असतानाच भारताविरुद्धच्या 3 सर्वात नीचांकी धावसंख्या उभारल्या गेल्या आहेत. विराटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने न्यूझीलंडला 62 धावांत गुंडाळले. दक्षिण आफ्रिकेचा संघही भारताविरुद्ध 79 धावांत गारद झाला होता. तसेच इंग्लंडला भारताविरुद्ध 81 धावा करता आल्या होत्या.

अश्विनचं ‘अर्धशतक’

रविचंद्रन अश्विनने 50 वेळा एका डावात 4 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. ही कामगिरी करणारा तो अनिल कुंबळेनंतर दुसरा भारतीय ठरला आहे. कुंबळेने आपल्या कसोटी कारकिर्दीत 66 वेळा एका डावात 4 विकेट्स घेतल्या आहेत. आर अश्विनने 2021 मध्ये 48 कसोटी विकेट घेतल्या आहेत. तो यावर्षी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

इतर बातम्या

Ajaz Patel | मुंबईत जन्म, न्यूझीलंडकडून भारताविरुद्ध मैदानात, एजाज पटेलने वानखेडेवरच टीम इंडियाला लोळवलं

कसोटी आणि वनडे खेळण्यासाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार, टी-20 मालिका स्थगित

IND vs NZ | विराट कोहली पुन्हा 0 वर बाद, अंपायरच्या निर्णयावर सवाल उपस्थित

(India vs New Zealand : NZ unwanted record, all out at 62 runs, Ravichandran Ashwin Brilliance, Virat kohli shines as captain)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.