
भरताने अवघ्या 4 चेंडूत 3 विकेट्स गमावल्या. वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे आणि त्यानंतर एरॉन जॉर्ज हे झटपट आऊट झाले. त्यानंतर आता वेदांत त्रिवेदी आणि विहान मल्होत्रा या जोडीचा संघर्ष सुरु आहे. भारताने 15 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 75 धावा केल्या आहेत.
मोहम्मद सय्याम याने आठव्या ओव्हरमध्ये भारताला 2 झटके देत बॅकफुटवर फेकलं. त्यानंतर अब्दुल सुभान याने नवव्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर भारताला तिसरा झटका दिला. सुभानने ओपनर एरॉन जॉर्ज याला आऊट केलं. एरॉनने 25 बॉलमध्ये 16 रन्स केल्या. एरॉन आऊट झाल्याने टीम इंडियाचा स्कोअर 8.1 ओव्हरमध्ये 3 आऊट 47 असा झाला आहे.
टीम इंडियाच्या सलामी जोडीने आश्वासक सुरुवात केली. मात्र त्यानंतर पाकिस्तानच्या मोहम्मद सय्याम याने धमाका केला. सय्याम याने भारताच्या स्टार जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. सय्यामने आधी आठव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर वैभव सूर्यवंशीला 30 रन्सवर आऊट केलं. त्यानंतर ओव्हरमधील सहाव्या अर्थात शेवटच्या बॉलवर सय्यामने आयुष म्हात्रे याला मैदाानाबाहेरचा रस्ता दाखवला. आयुषसा भोपळाही फोडता आला नाही.
वैभव सूर्यवंशी आणि एरॉन जॉर्ज या भारताच्या सलामी जोडीने संयमी सुरुवात केली आहे. या दोघांनी 6 ओव्हरमध्ये 35 धावा जोडल्या आहेत. वैभव 20 आणि एरॉन 14 धावांवर नाबाद खेळत आहेत.
नक्की काय स्वस्त आणि काय महाग, घ्या जाणून…
भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 6 फेरीतील सामन्याला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशी आणि एरॉन जॉर्ज ही सलामी जोडी बॅटिंगसाठी मैदानात आली आहे.
हमजा जहूर (विकेटकीपर), समीर मिन्हास, उस्मान खान, अहमद हुसैन, फरहान युसफ (कर्णधार), हुजैफा अहसान, अली हसन बलोच, अब्दुल सुभान, मोमीन कमर, मोहम्मद सय्यम आणि अली रझा.
आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), वेदांत त्रिवेदी, आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल आणि दीपेश देवेंद्रन.
पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्ध नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. कर्णधार फरहान यूसुफ याने फिल्डिंगचा निर्णय करत भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. अशात पाकिस्तानसमोर भारताला कमी धावसंख्येवर रोखण्याचं आव्हान असणार आहे.
अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीत आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंडने धडक दिली आहे. तर चौथा संघ कोणता असणार? हे भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपर 6 फेरीतील सामन्यातील पहिला चेंडू भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता टाकला जाणार आहे. तर 12 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
हमजा जहूर (विकेटकीपर), समीर मिन्हास, उस्मान खान, फरहान युसफ (कॅप्टन), अहमद हुसैन, हुजैफा अहसान, मोहम्मद शायन, अब्दुल सुभान, मोमीन कमर, मोहम्मद सय्यम, अली रझा, उमर झैब, अली हसन बलोच, दानियाल अली खान आणि निकाब शफीक.
आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), कनिष्क चौहान, आरएस अंबरिश, खिलन पटेल, हेनिल पटेल, उद्धव मोहन, हरवंश पंगालिया, मोहम्मद एनान, दीपेश देवेंद्रन आणि किशन कुमार सिंग.
उपांत्य फेरीसाठी आज रविवारी 1 फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सुपर 6 फेरीतील शेवटच्या सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे.
अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 6 फेरीतील शेवटच्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामन्याचा थरार रंगत आहे. हा सामना बुलावायोतील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी 3 संघ निश्चित झाले आहेत. तर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील विजेता उपांत्य फेरीत पोहचणारा चौथा संघ ठरेल. मात्र पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी मोठ्या फरकाने हा सामना जिंकावा लागणार आहे. अशात पाकिस्तान या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य असणाऱ्या टीम इंडिया विरुद्ध कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सामन्यातील प्रत्येक अपडेट्स आपण या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.