AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: भारत हरला, 29 वर्षानंतरही मालिका विजयाचं स्वप्न अपूर्ण, दक्षिण आफ्रिकेचा जबरदस्त खेळ

दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल आहेत. पण त्या खेळपट्टीवर भारताच्या वर्ल्डक्लास गोलंदाजी समोर दक्षिण आफ्रिकेने कशी फलंदाजी केली ?

IND vs SA: भारत हरला, 29 वर्षानंतरही मालिका विजयाचं स्वप्न अपूर्ण, दक्षिण आफ्रिकेचा जबरदस्त खेळ
| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 5:15 PM
Share

केपटाऊन: मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात अखेर भारताचा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे. पहिली सेंच्युरियन कसोटी (Centurion test) जिंकल्यामुळे 29 वर्षानंतर मालिका विजयाचे स्वप्न साकार होईल, अशी आशा निर्माण झाली होती. पण जोहान्सबर्ग पाठोपाठ केपटाऊन कसोटीतही (Cape town test) दक्षिण आफ्रिकेने भारताचा सात गडी राखून पराभव केला. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेकडून पीटरसनने शानदार 82 धावांची खेळी केली. डुसे-बावुमा जोडीने दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. आज दिवसभरात भारतीय गोलंदाजांना फक्त एक विकेट मिळवता आला.

पराभवाचं मुख्य कारण आहे ते…. दुसऱ्या विकेटसाठी एल्गर आणि पीटरसनमध्ये झालेली 77 धावांची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली. याच भागीदारीने विजयाचा पाया रचला. आज भारतीय गोलंदाज काही चमत्कार घडवतील असं वाटलं होतं. पणी ती अपेक्षा फोल ठरली. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावाप्रमाणे इथेही दक्षिण आफ्रिकेने सहज लक्ष्य गाठलं. सलग दुसऱ्या कसोटीत भारताच्या पराभवाच मुख्य कारण आहे ती, फलंदाजी.

फ्लॉप फलंदाजी या मालिकेला सुरुवात झाल्यापासून एखाद-दुसऱ्या खेळाडूचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजी फ्लॉप ठरली. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात कर्णधार विराट कोहली आणि दुसऱ्याडावात ऋषभ पंतने दमदार फलंदाजी दाखवली. त्यामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेसमोर निदान 212 धावांचे लक्ष्य ठेवता आले.

मग भारतीय फलंदाज तसा का खेळ दाखवू शकले नाहीत? दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल आहेत. पण त्या खेळपट्टीवर भारताच्या वर्ल्डक्लास गोलंदाजी समोर दक्षिण आफ्रिकेने कशी फलंदाजी केली ? मग भारतीय फलंदाज तसा का खेळ दाखवू शकले नाहीत? असा प्रश्न निर्माण होतो. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाज निष्प्रभ ठरतात हे पुन्हा एकदा दिसून आलं. जोहान्सबर्गमध्येही असचं झालं होतं. पहिल्या डावात 223 इतकी कमी धावसंख्या असूनही भारतीय गोलंदाजांनी आपल्या धारदार गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेला घायाळ केलं व 13 धावांची आघाडी मिळवली. पण दुसऱ्या डावात तशी कामगिरी करणे गोलंदाजांना जमलं नाही.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.