AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: 30 वर्षात धोनीच्या नेतृत्वातच टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेत सरस कामगिरी, जाणून घ्या रेकॉर्ड

एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. सात भारतीय कर्णधारांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेत विजयाचा प्रयत्न केला.

IND vs SA: 30 वर्षात धोनीच्या नेतृत्वातच टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेत सरस कामगिरी, जाणून घ्या रेकॉर्ड
| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 7:26 PM
Share

केपटाऊन: दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका (India vs South Africa) जिंकण्याच भारताच स्वप्न अखेर भंग पावलं आहे. केपटाऊन कसोटीच्या (Capetown test) चौथ्यादिवशी भारताचा सात विकेटने पराभव झाला. भारताने दिलेले 212 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने सहज पार केले. भारताने ही मालिका 2-1 ने गमावली. आता 19 जानेवारीपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ आठव्यांदा कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत गेला होता. पण एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. सात भारतीय कर्णधारांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेत विजयाचा प्रयत्न केला. भारताने आफ्रिकेत सर्वात चांगली कामगिरी 2010-11 मध्ये केली होती. त्यावेळी धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली होती.

1992-93 साली मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचा 0-1 असा पराभव झाला होता. डरबन, केपटाऊन आणि जोहान्सबर्गमधील कसोटी सामने ड्रॉ झाले होते. पोर्ट एलिजाबेथ येथील कसोटीत भारताचा पराभव झाला होता.

1996-97 साली सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचा 0-2 असा पराभव झाला. डरबन आणि केपटाऊन कसोटीत भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.

2001-02 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचा 0-1 असा पराभव झाला. ब्लॉमफाँटेन येथे झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नऊ विकेटने विजय मिळवला होता.

2006-07 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. भारताने शानदार सुरुवात केली. जोहान्सबर्ग कसोटीत यजमानांचा 123 धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेत भारताने मिळवलेला हा पहिला कसोटी विजय होता. पण डरबव आणि केपटाऊनमध्ये भारत हरला व मालिका 1-2 ने गमावली.

2010-11 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली. भारतान या दौऱ्यात चांगली कामगिरी केली व मालिका 1-1 अशी ड्रॉ केली. सेंच्युरियनमधल्या मोठ्या पराभवानंतर टीम इंडियाने डरबनमध्ये दुसरी कसोटी 87 धावांनी जिंकली. केपटाऊनची तिसरी कसोटी ड्रॉ झाली.

2013-14 मध्ये पुन्हा धोनीच्या नेतृत्वाखाली टीम दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली. त्यावेळी धोनी ब्रिगेडचा 0-1 ने पराभव झाला. जोहान्सबर्ग कसोटी ड्रॉ झाली. डरबन कसोटीत भारताचा दहा विकेटने पराभव झाला.

2017-18 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. केपटाऊन, सेंच्युरियनमध्ये विराटच्या संघाचा पराभव झाला. जोहान्सबर्ग कसोटीत भारताने 63 धावांनी विजय मिळवला. भारताने ही मालिका 1-2 ने गमावली.

2021-22 मध्ये टीम इंडियाने पुन्हा कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. यामध्ये पहिली सेंच्युरियन कसोटी जिंकली. पण जोहान्सबर्ग, केपटाऊनमध्ये पराभव झाला. भारताने ही मालिका 2-1 ने गमावली.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली