AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL 3rd T20: श्रीलंकेला लोळवलं, ‘हे’ आहेत टीम इंडियाच्या मालिका विजयाचे 4 सुपरस्टार

IND vs SL 3rd T20: टीम इंडियाने नव्या वर्षाची शानदार सुरुवात केली आहे. या सीरीज विजयात टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी महत्त्वाचा रोल निभावलाय. ते खेळाडू कोण? ते जाणून घे्ऊया.

IND vs SL 3rd T20: श्रीलंकेला लोळवलं, 'हे' आहेत टीम इंडियाच्या मालिका विजयाचे 4 सुपरस्टार
| Updated on: Jan 08, 2023 | 8:13 AM
Share

राजकोट: टीम इंडियाने सीरीज जिंकून 2023 मध्ये शानदार सुरुवात केली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंच्या टीम इंडियाने श्रीलंकेवर T20 सीरीजमध्ये 2-1 असा मालिका विजय मिळवला. सीरीजचा तिसरा सामना शनिवारी झाला. या निर्णायक मॅचमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेवर 91 धावांनी विजय मिळवला. या मालिका विजयाचे स्टार कोण आहेत? ते जाणून घ्या.

सूर्याने सीरीजमध्ये एकूण किती धावा केल्या?

या सीरीजमध्ये सूर्यकुमार यादवने सध्याच्या घडीचा T20 क्रिकेटमधील तो सर्वोत्तम फलंदाज असल्याचं दाखवून दिलं. त्याने तिसऱ्या सामन्यात सेंच्युरी तर दुसऱ्या मॅचमध्ये हाफ सेंच्युरी झळकवली. तो सीरीजमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने तीन मॅचमध्ये 170 धावा केल्या. या दरम्यान त्याची सरासरी 85 आणि स्ट्राइक रेट 175.25 चा होता.

प्लेयर ऑफ द सीरीजचा पुरस्कार कोणाला मिळाला?

अक्षर पटेल प्लेयर ऑफ द सीरीज पुरस्काराचा मानकरी ठरला. बॅट आणि बॉलने आपण टीम इंडियासाठी किती उपयुक्त ठरु शकतो, ते पटेलने या सीरीजमध्ये दाखवून दिलं. अक्षरने तीन सामन्यात एका हाफ सेंच्युरीसह एकूण 117 धावा केल्या. तीन मॅचमध्ये त्याने तीन विकेट काढल्यात.

उमरान मलिकने किती विकेट काढल्या?

स्पीडगन उमरान मलिकने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या सीरीजमध्ये उमरान मलिकने आपल्या भेदक गोलंदाजीच प्रदर्शन केलं. या सीरीजमध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. तीन मॅचमध्ये त्याने सात विकेट काढल्या. त्याच्या गोलंदाजीची इकॉनमी 9.63 होती. उमरान मलिकने या सीरीजमध्ये काही बॅट्समनना क्लीन बोल्ड केलं. हे विकेट ज्या पद्धतीने काढले, त्याला तोड नव्हती. हार्दिकने कशी कामगिरी केली?

कॅप्टन हार्दिक पंड्याने या सीरीजमध्ये शानदार कॅप्टनशिप केली. टीमला विजय मिळवून देण्यात त्याचे काही निर्णय महत्त्वपूर्ण ठरले. उदहारणार्थ पहिल्या सामन्यात अक्षर पटेलच्या हाती शेवटची ओव्हर देण्याचा धाडसी निर्णय. हार्दिकने या सीरीजमध्ये दोन विकेट काढले आणि 45 धावा केल्या. या सीरीजमध्ये त्याने प्रभावी कॅप्टनशिप केली.

Follow Us
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.