AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BREAKING: 1983 विश्वचषकाचे हिरो यशपाल शर्मा कालवश, ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

भारताचे माजी दिग्गज फलंदाज यशपाल शर्मा यांनी भारताकडून 37 टेस्ट आणि 42 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी अनेक अवघड सामने भारताला जिंकवून दिले.

BREAKING: 1983 विश्वचषकाचे हिरो यशपाल शर्मा कालवश, ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
यशपाल शर्मा
| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 11:44 AM
Share

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक क्षण असणारा 1983 विश्वचषक जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेले माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा (Yashpal Sharma) यांचे निधन झाले आहे. मंगळवारी (13 जुलै) सकाळच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने शर्मा यांचे निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. भारताकडून 37 कसोटी आणि 42 एकदिवसीय सामने खेळलेल्या शर्मा यांनी टेस्टमध्ये 2 शतकांच्या मदतीने 1606 रन्स बनवले होते. तर वनडे क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 89 रन्स आहेत. पण 1983 च्या विश्वचषकात त्यांनी खेळलेले काही सामने हे आजही सर्वांच्या स्मरणात आहेत आणि त्यांच्या अप्रतिम फलंदाजीमुळेच भारत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचू शकला होता. (Indias Former Cricketer Who Played Good Role in 1983 Wolrd Cup is No more Yashpal Sharma Passes Away due to Heart Attack)

यशपाल शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरोधात सियालकोट येथील एकदिवसीय सामन्यात 1978 मध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर त्यांनी पहिली टेस्ट इंग्लंड विरोधात क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर खेळली होती. शर्मा यांनी 1985 मध्ये इंग्लंड विरोधात चंदीगढ़ येथे शेवटची वन-डे खेळली होती. तर वेस्टइंडीज विरोधात दिल्ली येथे 1983 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

1983 विश्वचषकाचा हीरो

पंजाब संघाकडून रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या यशपाल शर्मा  यांनी 1978 मध्ये भारतीय क्रिकेट संघात वनडेमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 1979 मध्ये टेस्ट डेब्यू केला.  6 वर्षांहून अधिकच्या कारकिर्दीत यशपाल यांनी 37 टेस्टमध्ये 1606 धावा केल्या ज्यात दोन शतकांचा समावेश होता. तर 42 वनडेमध्ये 883 धावा केल्या. पण 1983 च्या विश्वचषकात यशपाल यांनी कामगिरी वाखाणण्याजोगी होती. वेस्टइंडीज विरोधातील पहिल्याच सामन्यात त्यांनी 89 धावंची दमदार खेळी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरोधातही 40 धावंची महत्त्वाची खेळी करणाऱ्या यशपाल यांनी सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरोधात 61 धावांची खेळी करुन सामना जिंकवून दिला होता.

निवृत्तीनंतरही क्रिकेटशी नाते कायम

भारताच्या फलंदाजीत मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज असणारे यशपाल शर्मा हे संपूर्ण आयुष्य क्रिकेटशी जोडून राहिले. क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही ते कोणत्या न कोणत्या मार्गाने क्रिकेटशी जोडून होते. ते टीम इंडियाचे राष्ट्रीय निवडकर्ते देखील होते. आधी डिसेंबर 2005 पर्यत निवडकर्ता म्हणून राहिलेले शर्मा 2008 मध्ये पुन्हा निवडकर्ते म्हणून भारतीय संघाशी जोडले गेले होते.

हे ही वाचा :

Dilip Kumar Death : दिलीप कुमार यांच्या शिफारसीने मिळाला ‘या’ क्रिकेटपटूला ब्रेक, विश्वचषक विजेत्या संघातही दमदार कामगिरी

भारतीय महिलांना 15 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर यश, दिर्घकाळापासूनची अपयशाची मालिका खंडित

अभूतपूर्व! हरलीनने टिपलेल्या झेलाचे मोदींकडूनही कौतुक, इन्स्टाग्राम स्टोरीतून केलं अभिनंदन

(Indias Former Cricketer Who Played Good Role in 1983 Wolrd Cup is No more Yashpal Sharma Passes Away due to Heart Attack)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.