AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs DC : मुंबईला धूळ चारत दिल्लीची प्लेऑफमध्ये दिमाखात एंट्री, रोहित अँड कंपनीचा मार्ग खडतर

मुंबईने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 12 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण मिळवले आहेत. यासह मुंबई गुणतालिकेत 6 व्या क्रमांकावर आहे.

MI vs DC : मुंबईला धूळ चारत दिल्लीची प्लेऑफमध्ये दिमाखात एंट्री, रोहित अँड कंपनीचा मार्ग खडतर
| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 10:16 PM
Share

दुबई : IPL 2021 स्पर्धेत आज शारजाह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 46 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला. तब्बल 5 वेळा आयपीएलचा खिताब पटकावलेला मुंबईचा संघ यंदा प्लेऑफमध्ये जाण्यापासून वंचित राहिल, अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. कारण आजच्या निर्णायक सामन्यात दिल्लीने मुंबईवर मात केली आहे. आयपीएलमध्ये आज उभय संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात दिल्लीने मुंबईचा 4 गडी राखून पराभव केला. (IPL 2021 : Delhi Capitals Beat Mumbai Indians By 4 Wickets, MI’s path toward playoffs is difficult)

या विजयासह दिल्लीने प्लेऑफचं तिकीट कन्फर्म केलं होतं, सोबतचं आजच्या विजयामुळे दिल्लीचं टॉप 2 मधलं स्थान अधिक बळकट झालं आहे. तर मुंबईने आजचा सामना गमावल्याने त्यांच्या प्लेऑफच्या शक्यता कमी झाल्या आहेत. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने आज नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय दिल्लीच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईला त्यांनी अवघ्या 129 धावांत रोखण्याचं काम केलं.

दिल्लीची चिवट फलंदाजी

त्यानंतर मुंबईने दिलेलं 130 धावांचं लक्ष्य दिल्लीच्या फलंदाजांनी चार गडी आणि पाच चेंडू राखून पूर्ण केलं. दिल्लीकडून या सामन्यात श्रेयस अय्यरने चिवट फलंदाजी करत निर्णायक 33 धावांची खेळी केली. त्याला आधी रिषभ पंतने 26 धावा करुन आणि अखेरच्या षटकात रवीचंद्रन अश्विने 20 धावा करुन चांगली साथ दिली.

मुंबईच्या गोलंदाजांनीदेखील या सामन्यात नेहमीप्रमाणे चांगली गोलंदाजी केली. मुंबईकडून या सामन्याट ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कृणाल पंड्या आणि नॅथन कुल्टर नाईलने प्रत्येकी एक विकेट घेतली.

मुंबईचा पहिला डाव

या डावात दिल्लीच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. मुंबईच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करु दिली नाही. मुंबईकडून या डावात सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 33 धावांची खेळी केली. याच्याव्यतिरिक्त मुंबईच्या कोणत्याही फलंदाजाला 20 पेक्षा जास्त धावा जमवता आल्या नाहीत. दिल्लीकडून आवेश खान आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. नॉर्खिया आणि रवीचंद्रन अश्विनला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

आधी गोलंदाजांची टिच्चून गोलंदाजी, त्यानंतर श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि रवीचंद्रन अश्विनच्या चिवट फलंदाजीच्या जोरावर अत्यंत चुरशीच्या सामन्यात दिल्लीने मुंबईवर विजय मिळवला.

मुंबईचा मार्ग खडतर

मुंबईने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 12 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण मिळवले आहेत. यासह मुंबई गुणतालिकेत 6 व्या क्रमांकावर आहे. मुंबईने जरी पुढचे दोन्ही सामने जिंकले तरी त्यांना प्लेऑफचं तिकीट मिळणं कठीण आहे. कारण प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या संघांमध्ये सर्वात वाईट रनरेट मुंबईचा आहे. त्यामुळे मुंबईला प्लेऑफचं तिकीट मिळवण्यासाठी पुढचे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतीलच. सोबत इतर संघांच्या सामन्यांमधील गणितांवरही मुंबईचं भवितव्य अवलंबून आहे.

इतर बातम्या

मंधानाचं शतक, भारतीय क्रिकेटपटू म्हणाली, ओ हसिना जुल्फोंवाली…., मग स्मृतीच्या उत्तराने बोलती बंद!

IPL 2021: मराठमोळ्या ऋतुराजसमोर फिके पडले सर्व फलंदाज, युएईत खास कामगिरी

IPL 2021: कर्णधार केएल राहुलची एकाकी झुंज यशस्वी, रोमहर्षक सामन्यात पंजाब 5 गडी राखून विजयी

(IPL 2021 : Delhi Capitals Beat Mumbai Indians By 4 Wickets, MI’s path toward playoffs is difficult)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.