AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: टीम मधल्या फलंदाजांवर KL Rahul ने काढला राग, ‘असं खेळतात का क्रिकेट?’

KL Rahul IPL 2022: खरंतर विजयानंतर कॅप्टनने खुश झालं पाहिजे. पण राहुलच्या बाबतीत उलट झालं, तो भडकला. मॅच संपल्यानंतर प्रेझेंटेशनच्यावेळी त्याला संघाच्या कामगिरीबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

IPL 2022: टीम मधल्या फलंदाजांवर KL Rahul ने काढला राग, 'असं खेळतात का क्रिकेट?'
KL RahulImage Credit source: BCCI
| Updated on: Apr 30, 2022 | 4:15 PM
Share

मुंबई: लखनौ सुपर जायंट्सने काल पंजाब किंग्स विरुद्धचा (LSG vs PBKS) सामना सहज जिंकला. IPL 2022 मध्ये सहावा विजय मिळवताना, पॉइंटस टेबलमध्येही त्यांनी झेप घेतली. पण तरीही संघाच्या कामगिरीवर कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) खूश नाहीय. केएल राहुलला आपल्या संघाकडून भरपूर अपेक्षा आहेत. फक्त एवढ्याने भागणार नाही, असं राहुलचं मत आहे. मॅच संपल्यानंतर राहुलच्या मनातला राग बाहेर निघाला. लखनौच्या टीममधील प्रत्येक फलंदाजावर राहुलने आपला राग व्यक्त केला. त्यांच्या खेळण्याची पद्धत आणि अनुभवावर राहुलने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आम्ही जिंकलो. पण चांगलं क्रिकेट खेळलो नाही, असंच राहुलला म्हणायचं होतं.

पुण्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनौने पंजाब किंग्सवर 20 रन्सनी विजय मिळवला. लखनौने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात आठ बाद 153 धावा केल्या. पंजाब किंग्सची टीम 154 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना निर्धारित 20 षटकात आठ बाद 133 धावा केल्या.

खरंतर विजयानंतर कॅप्टनने खुश झालं पाहिजे. पण राहुलच्या बाबतीत उलट झालं, तो भडकला. मॅच संपल्यानंतर प्रेझेंटेशनच्यावेळी त्याला संघाच्या कामगिरीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने हे उत्तर दिलं.

केएल राहुलने फलंदाजांना सुनावलं

“पहिल्या इनिंगनंतर माझ्या मनात संताप होता. आम्ही खराब फलंदाजी केली. संघातील अनुभवी फलंदाजांकडून अशी अपेक्षा नव्हती. आम्ही खूप खराब फलंदाजी केली. आम्ही 160 धावा धावफलकावर लावू असं वाटलं होतं. पण काहींनी खराब फटके खेळले, काही रनाऊट झाले. टीमच्या मधल्याफळीने निराश केलं” असं राहुल म्हणाला.

गोलंदाजांच केलं कौतुक

फलंदाजांना केएल राहुलने सुनावलं. पण गोलंदाजांच त्याने कौतुक केलं. “हा विजय संपूर्णपणे आमच्या गोलंदाजांचा आहे. त्यांच्यामुळे आम्हाला धावांचा बचाव करता आला व विजय मिळवण्यात आम्ही यशस्वी ठरलो” असं त्याने सांगितलं.

14 धावांमध्ये पाच विकेट

पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात दुसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी झाली. पण त्या व्यतिरिक्त डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. चार ओव्हर्समध्ये पाच विकेट 14 धावांमध्ये पडल्या. लखनौच्या गोलंदाजांनी आपल्या दमदार कामगिरीने फलंदाजांची ढिसाळ कामगिरी झाकली.

Follow Us
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत
महायुतीसमोरचं सर्वात मोठं संकट टळलं; गोकुळ गीते यांचं बंड अखेर थंडावलं
मोठी ब्रेकिंग! महायुतीसमोरचं सर्वात मोठं संकट टळलं; गोकुळ गीते यांचं बंड अखेर थंडावलं
घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुळेंचा हल्लाबोल
Supriya Sule | घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल