AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: गुजरात टायटन्स नंतर Mumbai Indians आणखी तीन टीम्सचा खेळ बिघडवू शकते, रोहित सेना दुसऱ्या संघासाठी बनली डेंजरस

IPL 2022: बलाढ्य गुजरात विरुद्ध मुंबईने विजय मिळवला. मुंबईची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे. पण हा संघ दुसऱ्या टीम्सच गणित मात्र बिघडवू शकतो.

IPL 2022: गुजरात टायटन्स नंतर Mumbai Indians आणखी तीन टीम्सचा खेळ बिघडवू शकते, रोहित सेना दुसऱ्या संघासाठी बनली डेंजरस
mumbai Indians Image Credit source: IPL
| Updated on: May 07, 2022 | 3:11 PM
Share

मुंबई: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील एक यशस्वी संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या टीमने पाच वेळा IPL चं विजेतेपद मिळवलं आहे. पण या टीमसाठी आयपीएलचा यंदाचा सीजन सर्वात खराब ठरला आहे. सलग आठ पराभवांनंतर मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफ शर्यतीत (Playoff Race) बाहेर गेला. नवव्या मॅच मध्ये मुंबई इंडियन्सला या सीजनमधला पहिला विजय मिळला. त्यानंतर कालही बलाढ्य गुजरात विरुद्ध मुंबईने विजय मिळवला. मुंबईची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे. पण हा संघ दुसऱ्या टीम्सच गणित मात्र बिघडवू शकतो. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. आठमध्ये पराभव तर दोन मॅचमध्ये विजय मिळवलाय. मुंबई इंडियन्सचे अजून चार सामने बाकी आहेत. ज्या संघांविरुद्ध या मॅचेस खेळायच्या आहेत, त्या टीम्स प्लेऑफसाठी दावेदार आहेत. अशा परिस्थिती मुंबई त्या टीम्ससाठी धोकादायक ठरु शकते.

सध्याच्या पोझिशननुसार काय गणित आहे?

मुंबईला पुढचे चार सामने कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळायचे आहेत. चेन्नईचा संघही मुंबई प्रमाणे प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर गेला आहे. त्यामुळे या सामन्याच्या निकालाचा विशेष काही फरक पडणार नाही. पण कोलकाता, दिल्ली आणि SRH प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. पॉइंटस टेबलमधली सध्याची पोझिशन बघितली, तर दिल्ली कॅपिटल्स 10 सामन्यात पाच विजय आणि पाच पराभवासह एकूण 10 गुण मिळवून पाचव्या स्थानावर आहे. हैदराबादचे आकडे सुद्धा दिल्ली सारखेच आहेत. पण नेट रनरेट कमी असल्याने ते सहाव्या स्थानावर आहेत. कोलकाता 10 सामन्यात चार विजय आठ पॉइंटसह आठव्या नंबरवर आहे.

मुंबईच्या प्रदर्शनावर तिघांचं भवितव्य

मुंबईने या तिन्ही टीम्सना हरवलं, तर त्यांचा प्लेऑफचा मार्ग अधिक खडतर होईल. दिल्लीला अजून चार सामने खेळायचे असून त्यांना कमीत कमी तीन विजय आवश्यक आहेत. मुंबईकडून दिल्लीचा पराभव झाला, तर त्यांचा मार्ग अजून खडतर होईल. हैदराबादची पण हीच स्थिती आहे. कोलकाताला आपले सर्व सामने जिंकावेच लागतील. मुंबईकडून पराभूत झाल्यास त्यांच्या प्लेऑफच्या स्वप्नांना मोठा धक्का बसू शकतो.

मुंबई आता विजयी मार्गावर परतली आहे. मागच्या दोन सामन्यात मुंबईने दमदार कामगिरी केली आहे. जास्तीत जास्त सामने जिंकून या सीजनचा चांगला शेवट करण्याचा रोहित शर्माचा प्रयत्न असेल.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप