IPL 2022: गुजरात टायटन्स नंतर Mumbai Indians आणखी तीन टीम्सचा खेळ बिघडवू शकते, रोहित सेना दुसऱ्या संघासाठी बनली डेंजरस

IPL 2022: बलाढ्य गुजरात विरुद्ध मुंबईने विजय मिळवला. मुंबईची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे. पण हा संघ दुसऱ्या टीम्सच गणित मात्र बिघडवू शकतो.

IPL 2022: गुजरात टायटन्स नंतर Mumbai Indians आणखी तीन टीम्सचा खेळ बिघडवू शकते, रोहित सेना दुसऱ्या संघासाठी बनली डेंजरस
mumbai Indians Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 3:11 PM

मुंबई: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील एक यशस्वी संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या टीमने पाच वेळा IPL चं विजेतेपद मिळवलं आहे. पण या टीमसाठी आयपीएलचा यंदाचा सीजन सर्वात खराब ठरला आहे. सलग आठ पराभवांनंतर मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफ शर्यतीत (Playoff Race) बाहेर गेला. नवव्या मॅच मध्ये मुंबई इंडियन्सला या सीजनमधला पहिला विजय मिळला. त्यानंतर कालही बलाढ्य गुजरात विरुद्ध मुंबईने विजय मिळवला. मुंबईची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे. पण हा संघ दुसऱ्या टीम्सच गणित मात्र बिघडवू शकतो. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. आठमध्ये पराभव तर दोन मॅचमध्ये विजय मिळवलाय. मुंबई इंडियन्सचे अजून चार सामने बाकी आहेत. ज्या संघांविरुद्ध या मॅचेस खेळायच्या आहेत, त्या टीम्स प्लेऑफसाठी दावेदार आहेत. अशा परिस्थिती मुंबई त्या टीम्ससाठी धोकादायक ठरु शकते.

सध्याच्या पोझिशननुसार काय गणित आहे?

मुंबईला पुढचे चार सामने कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळायचे आहेत. चेन्नईचा संघही मुंबई प्रमाणे प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर गेला आहे. त्यामुळे या सामन्याच्या निकालाचा विशेष काही फरक पडणार नाही. पण कोलकाता, दिल्ली आणि SRH प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. पॉइंटस टेबलमधली सध्याची पोझिशन बघितली, तर दिल्ली कॅपिटल्स 10 सामन्यात पाच विजय आणि पाच पराभवासह एकूण 10 गुण मिळवून पाचव्या स्थानावर आहे. हैदराबादचे आकडे सुद्धा दिल्ली सारखेच आहेत. पण नेट रनरेट कमी असल्याने ते सहाव्या स्थानावर आहेत. कोलकाता 10 सामन्यात चार विजय आठ पॉइंटसह आठव्या नंबरवर आहे.

मुंबईच्या प्रदर्शनावर तिघांचं भवितव्य

मुंबईने या तिन्ही टीम्सना हरवलं, तर त्यांचा प्लेऑफचा मार्ग अधिक खडतर होईल. दिल्लीला अजून चार सामने खेळायचे असून त्यांना कमीत कमी तीन विजय आवश्यक आहेत. मुंबईकडून दिल्लीचा पराभव झाला, तर त्यांचा मार्ग अजून खडतर होईल. हैदराबादची पण हीच स्थिती आहे. कोलकाताला आपले सर्व सामने जिंकावेच लागतील. मुंबईकडून पराभूत झाल्यास त्यांच्या प्लेऑफच्या स्वप्नांना मोठा धक्का बसू शकतो.

मुंबई आता विजयी मार्गावर परतली आहे. मागच्या दोन सामन्यात मुंबईने दमदार कामगिरी केली आहे. जास्तीत जास्त सामने जिंकून या सीजनचा चांगला शेवट करण्याचा रोहित शर्माचा प्रयत्न असेल.

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.