IPL 2022: प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर, पण Mumbai Indians मुळे तीन संघांचा खेळ बिघडू शकतो, ‘त्या’ तीन टीम्स कुठल्या?

IPL 2022: आयपीएलमध्ये यंदा आठ ऐवजी 10 संघ खेळतायत. गुणतालिकेची स्पर्धा अधिकच इंटरेस्टिंग झाली आहे. दोन पॉइंटस बरोबर नेट रनरेटही तितकाच आवश्यक बनला आहे.

IPL 2022: प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर, पण Mumbai Indians मुळे तीन संघांचा खेळ बिघडू शकतो, 'त्या' तीन टीम्स कुठल्या?
mumbai Indians Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 12:57 PM

मुंबई: मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) चाहत्यांनी शनिवारी सुटकेचा निश्वास सोडला. सलग आठ पराभवानंतर अखेर पहिला विजय मिळवला. मोसमातील पहिला विजय मिळवून रोहित शर्माला (Rohit sharma) काल टीमने बर्थ डे गिफ्ट दिलं. राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्सने (MI vs RR) पाच विकेट राखून विजय मिळवला. प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्सचा संघ आधीच बाहेर गेलाय. फक्त प्रतिष्ठा राखण्यासाठी अन्य सामन्यात विजय मिळवणं, त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. आयपीएल लीगमध्ये पहिल्यांदाच कुठलातरी संघ सलग आठ मॅच हरला आहे. मुंबई इंडियन्सची टीम आता उर्वरित सर्व सामने जिंकूनही प्लेऑफसाठी क्वालिफाय करु शकत नाही. पण असं असलं तरी, ते बाकी संघांचा खेळ मात्र नक्की बिघडवू शकतात.

आयपीएलमध्ये यंदा आठ ऐवजी 10 संघ खेळतायत. गुणतालिकेची स्पर्धा अधिकच इंटरेस्टिंग झाली आहे. दोन पॉइंटस बरोबर नेट रनरेटही तितकाच आवश्यक बनला आहे. मुंबई इंडियन्सचे अजून पाच सामने बाकी आहेत. प्रत्येक सामन्यात मुंबई इंडियन्सच्या विजयामुळे दुसऱ्या संघाचा खेळ बिघडू शकतो.

केकेआरचा खेळ मुंबई बिघडवणार?

मुंबई इंडियन्सला आता फक्त पाच सामने खेळायचे आहेत. गुजरात टायटन्स, कोलकाता नाइट रायडर्स, सनरायजर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स बरोबर त्यांचे हे सामने होतील. गुजरात टायटन्सचा संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचलाय. म्हणजे मुंबई इंडियन्सने त्यांना हरवलं, तरी फार फरक पडणार नाही. त्यानंतरचा सामना कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध आहे. केकेआरचे नऊ सान्यात सहा गुण झाले आहेत. त्यांचेही अजून पाच सामने बाकी आहेत. अजून एकापराभवामुळे केकेआरचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाऊ शकतो. सनरायजर्स हैदराबादचा संघ चौथ्या स्थानावर आहे. आठ सामन्यात त्यांचे 10 गुण झालेत. उर्वरित सहा सामन्यात त्यांना कमीत कमी अजून दोन विजय आवश्यक आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाल्यानंतरही त्यांना संधी असेल.

अजून दोन संघांना मुंबई पासून सावध रहाण्याची गरज

मुंबईचा चौथा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध आहे. त्यांची हालतही मुंबई सारखीच आहे. मुंबईला आतापर्यंत एकंमेव विजय मिळालाय, तर चेन्नईच्या खात्यात चार पॉइंटस आहेत. अजूनपर्यंत चेन्नईचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडलेला नाही. पण त्यांच्या पुढे जाण्याची शक्यताही कमी आहे. मुंबई विरुद्धचा पराभव त्यांच्या प्लेऑफच्या अपेक्षांवर पाणी फिरवू शकतो. मुंबईचा शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आहे. दिल्लीची टीम आठ सामन्यात चार मॅच जिंकली आहे. मुंबईकडून दिल्ली पराभूत झाली, तर त्यांच्या प्लेऑफमधील समीकरणावर त्याचा परिणाम होईल. दिल्लीला उर्वरित सहा सामन्यांपैकी चार सामन्यात विजय आवश्यक आहे.

Non Stop LIVE Update
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.