AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 RCB: ‘विराट आता जशास तसं उत्तर देणारा क्रिकेटपटू राहिला नाही’ RCB चा मोठा खेळाडू कोहलीबद्दल हे काय म्हणाला?

IPL चा 15 वा सीजन सुरु होण्यासाठी आता फक्त काही दिवसांचा अवधी उरला आहे. सर्वच संघांची जोरदार तयारी सुरु आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या कामगिरीवर क्रिकेट पंडित आणि मीडियाचं जास्त लक्ष असेल.

IPL 2022 RCB:  'विराट आता जशास तसं उत्तर देणारा क्रिकेटपटू राहिला नाही' RCB चा मोठा खेळाडू कोहलीबद्दल हे काय म्हणाला?
IPL 2022 - RCB विराट कोहली Image Credit source: File photo
| Updated on: Mar 17, 2022 | 6:51 PM
Share

नवी दिल्ली: IPL चा 15 वा सीजन सुरु होण्यासाठी आता फक्त काही दिवसांचा अवधी उरला आहे. सर्वच संघांची जोरदार तयारी सुरु आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या कामगिरीवर क्रिकेट पंडित आणि मीडियाचं जास्त लक्ष असेल. कारण अलीकडच्या काही मालिकांमध्ये विराट कोहलीला (Virat kohli) अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहली सातत्याने मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. विराटच्या बॅटमधून जणू धावा आटल्या आहेत. आयपीएलमध्ये विराटला सूर गवसतो का? याकडे माध्यमांचे लक्ष असणार आहे. विराट कोहलीकडे आता कर्णधारपदाची जबाबदारी नाहीय. त्यामुळे मुक्तपणे खेळ करण्यास त्याला वाव आहे. वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध विराट शेवटचा T-20 सामना खेळला होता. त्यावेळी त्याने आक्रमक खेळ केला होता. आगामी आयपीएलच्या सीजनमध्येही त्याच्याकडून अशाच खेळाची अपेक्षा आहे.

कॅप्टनशिपची जबाबदारी नसल्यामुळे विराट कोहली सध्या तणावमुक्त आहे. टेन्शन फ्री कोहली प्रतिस्पर्धी संघांसाठी जास्त धोकादायक ठरु शकतो, असं मत ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने व्यक्त केलं. विराट कोहलीने मागच्यावर्षी RCB चं कर्णधारपद सोडलं. त्यानंतर त्याने भारतीय संघाची टी 20 कॅप्टनशिपही सोडली.

विराट आता आक्रमक राहिलेला नाही

“विराट कोहलीमध्ये आता पहिल्या सारखी आक्रमकता राहिलेली नाही. विराट कोहली आता मैदानावर जशास तसं उत्तर देणारा क्रिकेटपटू राहिलेला नाही” असं मॅक्सवेलने आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे. त्याचं हे वक्तव्य RCB आणि विराटच्या चाहत्यांना कितपत पटेल? याबद्दल थोडी साशंकता आहे.

तो त्या दबावाखाली होता

BCCI ला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन कॅप्टन नको होते. त्यामुळे त्याला वनडे कॅप्टनशिपवरुन हटवण्यात आलं. “विराट कोहलीवर कॅप्टनशिपची जबाबदारी होती. तो त्या ओझ्याखाली होता. आता तो त्या जबाबदारीतून मुक्त झालाय प्रतिस्पर्धी संघांसाठी तो आता जास्त धोकादायक ठरु शकतो” असे मॅक्सवेल RCB च्या पॉडकास्टमध्ये म्हणाला. कॅप्टनशिपचा दबाव नसल्यामुळे कोहली पुढची काहीवर्ष मुक्तपणे क्रिकेट खेळण्याचा आनंद घेऊ शकतो असं मॅक्सवेलने म्हटलं आहे.

फाफ डू प्लेसिस RCB चा कॅप्टन RCB ने कॅप्टनशिपची जबाबदारी आता दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिसकडे दिली आहे. त्याचं मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिकच नाव RCB च्या कॅप्टनशिपसाठी आघाडीवर होतं. पण टीम मॅनेजमेंटने डू प्लेसिसवर विश्वास दाखवला. फाफ डू प्लेसिस चेन्नई सुपर किंग्सकडून खेळायचा. त्याने CSK कडून खेळताना सातत्यपूर्ण प्रदर्शन केलं आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली