IPL 2022 RCB: ‘विराट आता जशास तसं उत्तर देणारा क्रिकेटपटू राहिला नाही’ RCB चा मोठा खेळाडू कोहलीबद्दल हे काय म्हणाला?

IPL चा 15 वा सीजन सुरु होण्यासाठी आता फक्त काही दिवसांचा अवधी उरला आहे. सर्वच संघांची जोरदार तयारी सुरु आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या कामगिरीवर क्रिकेट पंडित आणि मीडियाचं जास्त लक्ष असेल.

IPL 2022 RCB:  'विराट आता जशास तसं उत्तर देणारा क्रिकेटपटू राहिला नाही' RCB चा मोठा खेळाडू कोहलीबद्दल हे काय म्हणाला?
IPL 2022 - RCB विराट कोहली Image Credit source: File photo
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 6:51 PM

नवी दिल्ली: IPL चा 15 वा सीजन सुरु होण्यासाठी आता फक्त काही दिवसांचा अवधी उरला आहे. सर्वच संघांची जोरदार तयारी सुरु आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या कामगिरीवर क्रिकेट पंडित आणि मीडियाचं जास्त लक्ष असेल. कारण अलीकडच्या काही मालिकांमध्ये विराट कोहलीला (Virat kohli) अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहली सातत्याने मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. विराटच्या बॅटमधून जणू धावा आटल्या आहेत. आयपीएलमध्ये विराटला सूर गवसतो का? याकडे माध्यमांचे लक्ष असणार आहे. विराट कोहलीकडे आता कर्णधारपदाची जबाबदारी नाहीय. त्यामुळे मुक्तपणे खेळ करण्यास त्याला वाव आहे. वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध विराट शेवटचा T-20 सामना खेळला होता. त्यावेळी त्याने आक्रमक खेळ केला होता. आगामी आयपीएलच्या सीजनमध्येही त्याच्याकडून अशाच खेळाची अपेक्षा आहे.

कॅप्टनशिपची जबाबदारी नसल्यामुळे विराट कोहली सध्या तणावमुक्त आहे. टेन्शन फ्री कोहली प्रतिस्पर्धी संघांसाठी जास्त धोकादायक ठरु शकतो, असं मत ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने व्यक्त केलं. विराट कोहलीने मागच्यावर्षी RCB चं कर्णधारपद सोडलं. त्यानंतर त्याने भारतीय संघाची टी 20 कॅप्टनशिपही सोडली.

विराट आता आक्रमक राहिलेला नाही

“विराट कोहलीमध्ये आता पहिल्या सारखी आक्रमकता राहिलेली नाही. विराट कोहली आता मैदानावर जशास तसं उत्तर देणारा क्रिकेटपटू राहिलेला नाही” असं मॅक्सवेलने आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे. त्याचं हे वक्तव्य RCB आणि विराटच्या चाहत्यांना कितपत पटेल? याबद्दल थोडी साशंकता आहे.

तो त्या दबावाखाली होता

BCCI ला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन कॅप्टन नको होते. त्यामुळे त्याला वनडे कॅप्टनशिपवरुन हटवण्यात आलं. “विराट कोहलीवर कॅप्टनशिपची जबाबदारी होती. तो त्या ओझ्याखाली होता. आता तो त्या जबाबदारीतून मुक्त झालाय प्रतिस्पर्धी संघांसाठी तो आता जास्त धोकादायक ठरु शकतो” असे मॅक्सवेल RCB च्या पॉडकास्टमध्ये म्हणाला. कॅप्टनशिपचा दबाव नसल्यामुळे कोहली पुढची काहीवर्ष मुक्तपणे क्रिकेट खेळण्याचा आनंद घेऊ शकतो असं मॅक्सवेलने म्हटलं आहे.

फाफ डू प्लेसिस RCB चा कॅप्टन RCB ने कॅप्टनशिपची जबाबदारी आता दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिसकडे दिली आहे. त्याचं मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिकच नाव RCB च्या कॅप्टनशिपसाठी आघाडीवर होतं. पण टीम मॅनेजमेंटने डू प्लेसिसवर विश्वास दाखवला. फाफ डू प्लेसिस चेन्नई सुपर किंग्सकडून खेळायचा. त्याने CSK कडून खेळताना सातत्यपूर्ण प्रदर्शन केलं आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.