AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs DC IPL 2023 : विराटचं अर्धशतक गेलं वाया, सॉल्ट आणि रुसोने धुलाई करत दिल्लीला तारलं

IPL 2023 : दिल्लीने गेल्या सामन्यांपासून स्पर्धेत जोरदार कमबॅक केलं आहे. गुजरात टायटन्सला पराभूत केल्यानंतर आता बंगळुरुला पराभवाचं पाणी पाजलं आहे. त्यामुळे प्लेऑफचं गणित आणखी किचकट झालं आहे.

RCB vs DC IPL 2023 : विराटचं अर्धशतक गेलं वाया, सॉल्ट आणि रुसोने धुलाई करत दिल्लीला तारलं
RCB vs DC IPL 2023 : दिल्लीचं बंगळुरुच्या स्वप्नांवर पाणी, 7 गडी राखून मिळवला विजयImage Credit source: Twitter
| Updated on: May 06, 2023 | 11:12 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 चा 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पार पडला. हा सामना बंगळुरुने 7 गडी राखून जिंकला. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं प्लेऑफचं गणित आणखी कठीण झालं आहे. बंगळुरुने 20 षटकात 4 गडी गमवून 181 धावा केल्या आणि विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं आहे. दिल्लीने हे आव्हान 16.4 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह दिल्लीने स्पर्धेत जबरदस्त कमबॅक केलं आहे. तर बंगळुरुची वाट बिकट झाली आहे.

दिल्लीचा डाव

बंगळुरुने विजयासाठी दिलेल्या 182 धावांचा पाठलाग करताना फिल सॉल्ट आणि डेविड वॉर्नरने आक्रमक खेळी केली. या जोडीने पहिल्या गड्यासाठी 60 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या मिशेल मार्शनेही आक्रमक पवित्रा कायम ठेवला. त्याने 17 चेंडूत 26 धावा केल्या. पण हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारताना बाद झाला. मात्र सॉल्टने आक्रमक पवित्रा कायम ठेवला. त्याला रिली रोसोची चांगली साथ लाभली. त्यांनी षटकार आणि चौकाराची आतषबाजी केली. त्यामुळे चेंडू जास्त आणि धावा कमी अशी स्थिती झाली.

फिल सॉल्टने 45 चेंडूत 87 धावा केल्या. या खेळीत 6 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश आहे. अवघ्या 11 धावा आवश्यक असताना अक्षर पटेल आला आणि पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. यामुळे विजय आणखी सोपा झाला.

बंगळुरुचा डाव

बंगळुरुने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फाफ आणि विराट कोहलीने सावध सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 82 धावांची भागीदारी केली. मात्र मिशेल मार्शच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने त्याचा झेल घेतला आणि तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेला ग्लेन मॅक्सवेल आपलं खातंही खोलू शकला नाही. मिशेल मार्शने त्याला पहिल्या चेंडूवर तंबूत परत पाठवलं.

दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर विराट आणि महिपाल लोमरोर यांनी डाव सावरला. दोघांनी 55 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीला मुकेश कुमारने तंबूचा रस्ता दाखवला. खलील अहमदने त्याचा झेल घेतला. त्याने 46 चेंडूत 55 धावांची खेळी केली.

महिपाल लोमरोरनं आयपीएलमधलं पहिलं अर्धशतक ठोकलं. त्याने 26 चेंडूत 52 धावा केल्या. त्यानंतर दिनेश कार्तिकने 9 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. त्यानंतर अनुज रावतने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला.

दोन्ही संघाचे खेळाडू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), केदार जाधव, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन) : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रोसो, मनीष पांडे, अमन हकीम खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.