AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wtc Final 2023 | टीम इंडियाची चिंता मिटली, या दिग्गज क्रिकेटरची केएल राहुल याच्या जागी निवड!

टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्यासाठी 7 ते 11 जून दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे. त्याआधी केएल राहुल टीममधून बाहेर पडल्याने भारतीय क्रिकेट संघांचे टेन्शन वाढवं होंतं. मात्र आता डोन्ट वरी.

Wtc Final 2023 | टीम इंडियाची चिंता मिटली, या दिग्गज क्रिकेटरची केएल राहुल याच्या जागी निवड!
| Updated on: May 07, 2023 | 5:36 PM
Share

मुंबई | टीम इंडिया आयपीएल 16 व्या मोसमानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळणार आहे. हा सामना लंडनमधील द ओव्हल क्रिकेट ग्राउंडवर 7 ते 11 जूनदरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर सामन्यात पाऊस किंवा इतर कोणत्याही कारणाने अडथळा येऊन वेळ वाया जाऊ नये, यासाठीही आयसीसीने खबरदारी घेतली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा तांत्रिक अडचणींमुळे जर दिवस वाया गेला, तर त्या दिवसाचा खेळ हा राखीव दिवशी खेळवण्यात येईल. त्यामुळे या सामन्याचा निकाल निघणार हे शंभर टक्के. या महामुकाबल्यासाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघाची घोषणा करण्यात आली आहे.

या महामुकाबल्याला मोजून एक महिना बाकी आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाचे बरेचसे खेळाडू हे दुखापतीच्या कचाट्यात सापडले आहेत. यामध्ये शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट आणि केएल राहुल या तिघांना दुखापतीने ग्रासलंय. डोकेदुखी म्हणजे केएल राहुल याला आयपीएलमध्ये 1 मे रोजी आरसीबी विरुद्धच्या सामन्यात फिल्डिंग दरम्यान मांडीला दुखापत झाली. त्यामुळे लखनऊ सुपर जायंट्सचा कॅप्टन असलेल्या केएल राहुल याला या आयपीएल 16 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधून बाहेर पडावं लागलं. त्यामुळे टीम इंडियाच्या गोटात सीरिअस वातावरण होतं. मात्र ज्या आयपीएलमुळे केएल याला बाहेर पडावं लागलं, त्याच आयपीएलमधून टीम इंडियाला केएलचा पर्याय मिळाला आहे.

आयपीएलचा 16 व्या मोसमातील 51 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने आहेत. लखनऊने या सामन्यात टॉस जिंकून गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं. गुजरातकडून अनुभवी विकेटकीपर बॅट्समन ऋद्धीमान साहा याने एकदम कडक बॅटिंग केली. ऋद्धीमानने अवघ्या 43 बॉलमध्ये 10 चौकार आणि 4 खणखणीत षटकारांच्या मदतीने 81 धावांची जबरदस्त खेळी केली.

ऋद्धीमानने यासह निवड समितीला आपल्याकडे केएल राहुल याची बदली खेळाडू म्हणून पाहण्यासाठी भाग पाडलंय. विशेष बाब म्हणजे केएल आणि ऋद्धीमान हे दोघे विकेटकीपर बॅट्समन आहे. त्यामुळे ऋद्धीमान याची इशान किशन याच्या तुलनेत निवड होण्याची अधिक शक्यता आहे. ऋद्धीमान इशानच्या तुलनने अनुभवी आहे. तसेच अनेक बाबतीत ऋद्धीमान हा अनुभवी आहे. यामुळे आता केएल राहुल याच्या जागी ऋद्धीमानला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये संधी द्यायला हवी, असं नेटकऱ्याचं म्हणनं आहे.

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

WTC Final साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.