AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kohli vs Gambhir: भांडणाच्या पाच दिवसानंतर विराट कोहली अ‍ॅक्शन मोडमध्ये, बीसीसीआय अधिकाऱ्यांना सांगितल की…

आयपीएल 2023 साखळी फेरीतलील लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील दोन्ही सामने संपले आहेत. मात्र असं असलं तरी विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद संपण्याचं नाव घेत नाही.

Kohli vs Gambhir: भांडणाच्या पाच दिवसानंतर विराट कोहली अ‍ॅक्शन मोडमध्ये, बीसीसीआय अधिकाऱ्यांना सांगितल की...
Kohli vs Gambhir ये झगडा खत्म क्यों नहीं होता..! पाच दिवसानंतर विराट कोहलीने काढलं अस्त्र, बीसीसीआय अधिकाऱ्यांना म्हणाला..
| Updated on: May 06, 2023 | 2:38 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील रंगत एका बाजूला आणि विराट-गंभीर आणि विराट-गांगुली वाद हा दुसऱ्या बाजूला. सध्या विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद ताजा आहे. सोशल मीडियावर या वादाची चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपर जायंट्स सामना संपल्यानंतर गंभीर-विराट भिडले होते. हा वाद अफगाणिस्तानचा खेळाडू असलेल्या नवीन उल हकमुळे वाढला होता. या वादानंतर बीसीसीआयने कोहली आणि गंभीर विरोधात सामना फीसच्या 100 टक्के रक्कम, तर नवीन वर सामन्याच्या 50 टक्के रक्कम भरण्याचा दंड ठोठावला होता.

पाच दिवसानंतर विराट कोहलीने आपलं अस्त्र काढलं आहे. बीसीसीआयला लेटर लिहित सांगतिल आहे की, माझी यात कोणतीच चूक नव्हती. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार कोहलीने सांगितलं आहे की, भांडणात गौतम गंभीर आणि नवीन असं काहीच बोललो नाही की इतका दंड ठोठावला जाईल. बीसीसीआयने त्याच्या सामना फीमधली पूर्ण रक्कम कापू नये. त्याचबरोबर विराट कोहलीने नवीन उल हकची तक्रार देखील केली आहे.

गंभीर आणि विराटला किती दंड ठोठावला

विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक या वादाला कारणीभूत ठरले. बीसीसीआयने या प्रकरणी तिघांना दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी दंडात्मक कारवाई म्हणून कोहलीला 100 टक्के सामना फी भरण्याचा दंड ठोठावला आहे. म्हणजेच 1.07 कोटी रुपये भरावे लागतील. तर गौतम गंभीरला 100 टक्के सामना फी म्हणजेच 25 लाख रुपये भरायचे आहेत.

गंभीर आणि कोहलीकडून 2.21 या नियमाचं उल्लंघन

आयपीएल स्पर्धेतील सामन्यात खेळाडूंकडून गैरवर्तन होऊ नये यासाठी बीसीसीआयने नियमावली तयार केली आहे. सामन्यात एखाद्या खेळाडूने उल्लंघन केलं तर या नियमांतर्गत कारवाई केली जाते. विराट आणि गंभीर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या घटनेची दखल बीसीसीआयने घेतली आणि नियम 2.21 नुसार कारवाई केली.

काय आहे आयपीएल नियम 2.21

आयपीएल कोड ऑफ कंडक्टमधील 2.21 हा नियम खूप महत्त्वाचा आहे. एखाद्या वादामुळे खेळाचं नाव खराब झाल्यास हा नियम लागू होतो. विराट आणि गंभीर वादामुळे असंच काहीसं झालं आहे. या नियमांतर्गत जाणीवपूर्वक डिवचणे, अश्लिल टिका करणे यांचा समावेश आहे. भर मैदानात विचित्र कृती करणे यात नमूद आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.