AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : ‘भविष्यात जर परत विराटने असं केलं तर…’; नवीन उल हकचा कोहलीला उघडपणे इशारा!

विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यामध्ये तू तू मे मे झालं. त्यानंतर कोहली आणि गंभीर एकमेकांना भिडले होते. या वादामुळे आयपीएलला डाग लागलाच आणि खेळाडूंवरही टीका झाली होती. अशातच या वादामध्ये नेमकं काय झालं होतं ते नवीन उल हक याने सांगितलं आहे.

Virat Kohli : 'भविष्यात जर परत विराटने असं केलं तर...'; नवीन उल हकचा कोहलीला उघडपणे इशारा!
Virat kohli-Naveen ul haqImage Credit source: twitter
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 15, 2023 | 9:26 PM
Share

मुंबई : आयपीएलमधील 16 व्या पर्वामध्ये स्टार खेळाडू विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांच्यामधील राडा कोणीही विसरलं नसेल. आरसीबी आणि लखनऊमधील मॅचदरम्यान झालेला राडा अवघ्या क्रिकेट जगताने पाहिलेला. त्या वादामध्ये नेमकी चूक कोणाची होती? कारण मैदानात असताना विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यामध्ये तू तू मे मे झालं. त्यानंतर कोहली आणि गंभीर एकमेकांना भिडले होते. या वादामुळे आयपीएलला डाग लागलाच आणि खेळाडूंवरही टीका झाली होती. अशातच या वादामध्ये नेमकं काय झालं होतं ते नवीन उल हक याने सांगितलं आहे.

काय म्हणाला नवीन उल हक?

नवीन उल हकने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, मी कोणालाच काही चुकीचं बोलत नाही आणि मला कोणी काही चुकीचं बोललेलंही ऐकून घेत नाही. मॅच संपल्यानंतर आम्ही हस्तांदोलन करताना तेव्हा विराटने सुरुवात केली होती. कारण नंतर रेफरीने ठोठावलेल्या दंडावरून हे सर्व कोणी सुरू केले हे स्पष्ट होत असल्याचं नवीन म्हणाला. भविष्यात जर परत असं झालं तर मी याच पद्धतीने उत्तर देणार असल्याचंही नवीनने बोलताना सांगितलं.

मी शेक हँड करून माघारी जात असताना कोहलीने माझा हात पकडून ठेवला. त्यावेळी मी त्याचा हात झटकला, पण सोशल मीडियावर माझ्याविरूद्ध दाखवण्यात आलं. याचा माझ्यावर काही परिणाम झाला नाही कारण मी फक्त खेळाकडे लक्ष देतो. मी सहसा स्लेजिंग करत नाही पण त्या दिवशी सामन्यात मी कोहलीला एक शब्दही बोललो नसल्याचंही नवीनने म्हटलं आहे.

दरम्यान, विराट कोहली आणि नवीनची भांडणं झालीत. त्यानंतर गौतम गंभीर आल्यावर दोघांमध्ये वातावरण तापलेलं होतं. अमित मिश्रा याने मध्यस्थी करत भांडणं मिटावलं होतं.त्यानंतरही दोघे आरसीबी आणि लखनऊच्या मॅचवेळी इन्स्टा स्टोरी टाकत एकमेकांनी आपली टशन सुूरू ठेवलीये.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.