AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 | मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन हटवलं! हार्दिक पुढचा कॅप्टन

Mumbai Indian Hardik Pandya | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलमधील यशस्वी असलेल्या मुंबई इंडियन्स टीमचा कर्णधार बदलण्यात आला आहे. रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आलं आहे.

IPL 2024 | मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन हटवलं! हार्दिक पुढचा कॅप्टन
| Updated on: Dec 15, 2023 | 7:07 PM
Share

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे आयपीएलच्या आगामी 17 व्या मोसमाकडे लागलं आहे. या 17 व्या मोसमाआधी येत्या 19 डिसेंबरला मंगळवारी ऑक्शन पार पडणार आहे. या ऑक्शनचं आयोजन हे दुबईत करण्यात आलं आहे. या ऑक्शनमध्ये 77 जागांसाठी 333 खेळाडू मैदानात आहेत. ऑक्शनआधी केकेआर अर्थात कोलकाता नाईट रायडर्सने कॅप्टन बदलला. श्रेयस अय्यर याच्याकडे पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर नितीश राणा याला उपकर्णधारपदाची सूत्र देण्यात आली. त्यानंतर आता मुंबई इंडियन्स टीम मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेतला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सने कॅप्टन बदलला आहे. कर्णधारपदावरुन रोहित शर्मा याची उचलबांगडी केली आहे. रोहित शर्मा 2013 पासून मुंबईचं नेतृत्व करत होता. तर आता हार्दिक पंड्या याला कर्णधार करण्यात आलं आहे. हार्दिक पंड्या याला मुंबई इंडियन्समध्ये गुजरात टायटन्स टीमधून ट्रेड करुन घेतलं होतं. त्याआधी हार्दिक 2015 ते 2021 पर्यंत मुंबई इंडियन्सकडूनच खेळायचा.  आता येत्या 17 व्या मोसमात आता हार्दिक पंड्या याच्याकडे आपल्या कॅप्टन्सीत मुंबईला सहाव्यांदा चॅम्पियन करण्याची जबाबदारी असणार आहे.

हार्दिकने आपल्या नेतृत्वात पदार्पणातीलच हंगामात गुजरात टायटन्सला आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्याची कामगिरी केली. हार्दिकने 2022 मध्ये गुजरात टायटन्सला चॅम्पियन केलं होतं. मुंबईने हार्दिकला 2022 च्या लिलावाआधी करारमुक्त केलं होतं. मात्र आता पुन्हा हार्दिक मुंबईत आलाय आणि थेट कॅप्टन झालाय.

गुजरातच्या हार्दिक पंड्याकडे मुंबईचं नेतृत्व

आयपीएलमधील यशस्वी कर्णधार

रोहित शर्माने 2013 पासून ते 2023 या कालावधीदरम्यान मुंबई इंडियन्सचं नेतृत्व सांभाळलं. रोहितने या दरम्यान मुंबईला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. रोहितने मुंबईला 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या वर्षात ट्रॉफी जिंकून दिली. तसेच मुंबई गेल्या हंगामात प्लेऑफपर्यंत पोहचली. मात्र मुंबई त्यापुढे जाण्यात अपयशी ठरली.

रोहितची आयपीएल कारकीर्द

दरम्यान रोहितने आतापर्यंत आयपीएलमध्ये 243 सामने खेळले आहेत. या 243 सामन्यांमध्ये रोहितने 130.05 च्या स्ट्राईक रेटने 1 शतक आणि 42 अर्धशतकांच्या मदतीने 6 हजार 211 धावा केल्या आहेत.

Follow Us
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे...
Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच...