AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs CSK Rain : मुसळधार पावसामुळे खेळ थांबला, चाहते नाराज

RCB vs CSK Weather Forcast : एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला आहे.

RCB vs CSK Rain : मुसळधार पावसामुळे खेळ थांबला, चाहते नाराज
rcb vs csk rainImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: May 18, 2024 | 8:21 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 68 व्या सामन्यात अखेर ज्याची भीती होती, तेच झालं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यात पावसाची एन्ट्री झाल्याने खेळ थांबवण्यात आला आहे. सामन्याला 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात झाली. त्यानंतर 15 मिनिटांनी एम चिन्नास्वामी स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. आरसीबीच्या विराट कोहली आणि कॅप्टन फाफ डु प्लेसीस या सलामी जोडीने तडाखेदार सुरुवात करुन दिली. या दोघांच्या तुफान बॅटिंगनंतर पावसाने आपल्या मुसळधार बॅटिंगला सुरुवात केली आणि सामना थांबवण्यात यश मिळवलं. पावसाची एन्ट्री होताच आरसीबीचे दोन्ही फलंदाज आणि सीएसकेची टीम मैदानाबाहेर गेली. तर ग्राउंड्समॅन टीमने फटाफट खेळपट्टी आणि महत्त्वाचा भाग कव्हर्सने झाकला. आता क्रिकेट चाहते सामना पुन्हा सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

चेन्नईने टॉस जिंकून आरसीबाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आरसीबीकडून फाफ आणि विराट ही जोडी बॅटिंगसाठी मैदानात आली. या सलामी जोडीने पहिल्या 3 ओव्हरमध्ये 10.33 च्या रनरेटने बिनबाद 31 धावा जोडल्या. फाफ डु प्लेसीसने 9 बॉलमध्ये नाबाद 12 धावा केल्या. तर विराट 9 बॉलमध्ये 19 धावा करुन खेळत होता. इतक्यात पावसाने आपली एन्ट्री घेतली. पाऊस आल्याने आरसीबीचे दोन्ही फलंदाज हे ड्रेसिंग रुममध्ये गेले. काही मिनिटं मुसळधार झाल्यानंतर रिपरिप सुरु झाली आणि अखेर पाऊस आऊट झाला. त्यानंतर विराट आणि फाफ दोघेही निघून डगआऊटमध्ये आले. आता क्रिकेट चाहते आणि दोन्ही संघ हे सामना सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

ग्राउंड स्टाफकडून पाऊस थांबल्यानंतर मैदान कोरडं करण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. तसेच मैदानात जमा झालेलं पाणी शक्य तितक्या वेगाने हटवण्याचे काम केलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला संबंधित टीम ही मैदानात जाऊन पाहणी केली. आता सामना कधी एकदाचा सुरु होतोय, याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.

मोठी अपडेट

दरम्यान क्रिकेट चाहत्यांसाठी काही मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर गूड न्यूज समोर आली आहे. सामन्याला अखेर 8 वाजून 25 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. पावसामुळे जवळपास 40 मिनिटांचा वेळ वाया गेला. मात्र त्यानंतरही ओव्हर कापण्यात आलेल्या नाहीत.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन आणि मोहम्मद सिराज.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दूल ठाकुर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग आणि महेश तीक्षना.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.