AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025, MI vs GT : एलिमिनेटर सामना रद्द झाला तर हा संघ बाहेर, जाणून घ्या धक्कादायक नियम

आयपीएल 2025 स्पर्धेतील एलिमिनेटर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. कारण पराभव झाला तर स्पर्धेबाहेर जाईल. हा सामना मुल्लांपूर क्रिकेट मैदानात खेळला जाईल. पण हा सामना पावसामुळे रद्द झाला तर एक संघ आऊट होईल. कसं काय ते जाणून घ्या

IPL 2025, MI vs GT : एलिमिनेटर सामना रद्द झाला तर हा संघ बाहेर, जाणून घ्या धक्कादायक नियम
हार्दिक पांड्या आणि शुबमन गिलImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 29, 2025 | 2:56 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेच्या प्लेऑफ सामन्यांना सुरुवात झाली आहे. 29 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स हे संघ क्वॉलिफायर 1 फेरीत आमनेसामने येतील. या सामन्यातील विजयी संघ थेट अंतिम फेरी गाठणार आहे. तर पराभूत संघाला अंतिम फेरीसाठी आणखी एक संधी मिळणार आहे. दुसरीकडे, एलिमिनेटर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा सामना 30 मे रोजी होणार आहे. मोहालीतील मुल्लांपूर क्रिकेट स्टेडियमममध्ये हे दोन्ही संघ आमनेसामने येतील. या सामन्यात पराभूत झालेल्या संघाला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागेल. तर विजयी संघ क्वॉलिफायर 2 फेरीत खेळेल. पण एलिमिनेटर सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर कोणत्या संघ बाहेर जाईल. असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण साखळी फेरीत प्रत्येकी एक गुण देऊन विषय संपत होता. मात्र आता तसं होणार नाही. अशा स्थितीत काय होतं? जाणून घ्या बीसीसीआयचा नियम

एलिमिनटेर सामना रद्द झाला तर कोण बाहेर जाईल?

आयपीएल 2025 स्पर्धेत एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्स आणि चौथ्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्स यांच्यात हा सामना होत आहे. या सामन्यातील विजयी संघ पुढच्या फेरीत म्हणजेच क्वॉलिफायर 2 मध्ये खेळेल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरोची लढाई आहे. पण या सामन्यासाठी बीसीसीआयने राखीव दिवस ठेवलेला नाही. म्हणून हा सामना काही कारणास्तव रद्द झाला तर पुढच्या सामन्याचं तिकीट कोणाला मिळेल? आणि कोणता संघ बाहेर जाईल? जाणून घ्या.

साखळी फेरीत गुजरात टायटन्सने 18 गुणांसह गुणतालिकेत तिसरं स्थान गाठलं आहे. तर मुंबई इंडियन्स 16 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द झाला तर गुजरात टायटन्सला पुढच्या फेरीचं तिकीट मिळेल. तर मुंबई इंडियन्सला गाशा गुंडाळावा लागेल. क्वॉलिफायर 1 आणि एलिमिनेटर सामन्यासाठी राखीव दिवस नसल्याने हा नियम असणार आहे. पण क्वॉलिफायर 2 आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस आहे. नियोजित दिवशी सामना पूर्ण झाला नाही तर पुढच्या दिवशी खेळवला जाईल. राखीव दिवशी सामना जिथे थांबला तेथूनच सुरुवात होईल.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.