AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025, MI vs GT : एलिमिनेटर सामना रद्द झाला तर हा संघ बाहेर, जाणून घ्या धक्कादायक नियम

आयपीएल 2025 स्पर्धेतील एलिमिनेटर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. कारण पराभव झाला तर स्पर्धेबाहेर जाईल. हा सामना मुल्लांपूर क्रिकेट मैदानात खेळला जाईल. पण हा सामना पावसामुळे रद्द झाला तर एक संघ आऊट होईल. कसं काय ते जाणून घ्या

IPL 2025, MI vs GT : एलिमिनेटर सामना रद्द झाला तर हा संघ बाहेर, जाणून घ्या धक्कादायक नियम
हार्दिक पांड्या आणि शुबमन गिलImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 29, 2025 | 2:56 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेच्या प्लेऑफ सामन्यांना सुरुवात झाली आहे. 29 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स हे संघ क्वॉलिफायर 1 फेरीत आमनेसामने येतील. या सामन्यातील विजयी संघ थेट अंतिम फेरी गाठणार आहे. तर पराभूत संघाला अंतिम फेरीसाठी आणखी एक संधी मिळणार आहे. दुसरीकडे, एलिमिनेटर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा सामना 30 मे रोजी होणार आहे. मोहालीतील मुल्लांपूर क्रिकेट स्टेडियमममध्ये हे दोन्ही संघ आमनेसामने येतील. या सामन्यात पराभूत झालेल्या संघाला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागेल. तर विजयी संघ क्वॉलिफायर 2 फेरीत खेळेल. पण एलिमिनेटर सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर कोणत्या संघ बाहेर जाईल. असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण साखळी फेरीत प्रत्येकी एक गुण देऊन विषय संपत होता. मात्र आता तसं होणार नाही. अशा स्थितीत काय होतं? जाणून घ्या बीसीसीआयचा नियम

एलिमिनटेर सामना रद्द झाला तर कोण बाहेर जाईल?

आयपीएल 2025 स्पर्धेत एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्स आणि चौथ्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्स यांच्यात हा सामना होत आहे. या सामन्यातील विजयी संघ पुढच्या फेरीत म्हणजेच क्वॉलिफायर 2 मध्ये खेळेल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरोची लढाई आहे. पण या सामन्यासाठी बीसीसीआयने राखीव दिवस ठेवलेला नाही. म्हणून हा सामना काही कारणास्तव रद्द झाला तर पुढच्या सामन्याचं तिकीट कोणाला मिळेल? आणि कोणता संघ बाहेर जाईल? जाणून घ्या.

साखळी फेरीत गुजरात टायटन्सने 18 गुणांसह गुणतालिकेत तिसरं स्थान गाठलं आहे. तर मुंबई इंडियन्स 16 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द झाला तर गुजरात टायटन्सला पुढच्या फेरीचं तिकीट मिळेल. तर मुंबई इंडियन्सला गाशा गुंडाळावा लागेल. क्वॉलिफायर 1 आणि एलिमिनेटर सामन्यासाठी राखीव दिवस नसल्याने हा नियम असणार आहे. पण क्वॉलिफायर 2 आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस आहे. नियोजित दिवशी सामना पूर्ण झाला नाही तर पुढच्या दिवशी खेळवला जाईल. राखीव दिवशी सामना जिथे थांबला तेथूनच सुरुवात होईल.

कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.