IND vs SA : जसप्रीत बुमराहचं क्विंटन डीकॉकला पुन्हा पडलं स्वप्न, 27 चेंडूत असं काही घडलं

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत दक्षिण अफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी 188 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. खरं तर हे आव्हान खूप मोठं आहे आणि आतापर्यंत भारताने इतकं मोठं लक्ष्य टी20 वर्ल्डकपमध्ये गाठलेलं नाही. हे लक्ष्य आणखी मोठं असतं पण बुमराहने धावगतीला ब्रेक मारला.

IND vs SA : जसप्रीत बुमराहचं क्विंटन डीकॉकला पुन्हा पडलं स्वप्न, 27 चेंडूत असं काही घडलं
IND vs SA : जसप्रीत बुमराहचं क्विंटन डीकॉकला पुन्हा पडलं स्वप्न, 27 चेंडूत असं काही घडलं
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 22, 2026 | 9:30 PM

टी20 वर्ल्डकप 2026 सुपर 8 फेरीतील दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला. त्यामुळे मनासारखा निर्णय घेता आला नाही. खरं तर भारताला प्रथम फलंदाजी करायची होती. पण वाटेला आली ती गोलंदाजी.. पण भारतीय गोलंदाजांनी कर्णधार सूर्यकुमार यादवला निराश केलं नाही. फलंदाजीसाठी पूरक असलेल्या मैदानात पावर प्लेमध्ये दक्षिण अफ्रिकेला बऱ्यापैकी रोखलं. यात मोलाचा हातभार राहिला तो जसप्रीत बुमराहचा.. त्याने पावरप्लेच्या 2 षटकात दक्षिण अफ्रिकेला 2 धक्के दिले. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेचा संघ बॅकफूटवर गेला. तसेच 200 हून अधिक धावा देण्याचं स्वप्न भंगलं. पण 188 धावाही काही छोटं टार्गेट नाही. पण दक्षिण अफ्रिकेला येथपर्यंत रोखण्यात जसप्रीत बुमराहला यश आलं. पहिल्या षटकात जसप्रीत बुमराहाने क्विंटन डी कॉकची विकेट काढली. खरं तर डीकॉकला जसप्रीत बुमराहाचा सामना करणं अडचणीचं गेलं आहे. आताही तसंच दिसलं.

टीम इंडियाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह मैदानात आलं. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर क्विंटन डीकॉकने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पण यात फसला आणि सरळ स्टम्प घेऊन गेला. क्विंटन डीकॉक 7 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. खरं तर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये डीकॉकने बुमराहच्या 27 चेंडूंचा सामना केला आहे. यात त्याने 29 धावा काढल्या आहेत. तसेच तीन वेळा विकेट दिली आहे. डीकॉकने बुमराहविरुद्ध सरासरी फक्त 9.66 ची आहे. तसेच स्ट्राईक रेट हा 10.40चा आहे. विशेष म्हणजे बुमराहने तिन्ही वेळा बोल्ड केलं आहे. जसप्रीत बुमराहने 4 षटकात फक्त 15 धावा दिल्या. तसेच तीन विकेट काढल्या. त्याचा इकोनॉमी रेट हा 3.80 चा होता.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत जसप्रीत बुमराह टिम इंडियाकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने एकाच सामना आर अश्विन आणि अर्शदीप सिंगचा विक्रम मोडीत काढला. आर अश्विनने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 32 विकेट घेतल्या होत्या. तर अर्शदीपच्या नावावर 32 विकेट आहेत. पण जसप्रीत बुमराह या दोघांच्या पुढे निघाला असून त्याच्या नावावर 33 विकेट आहेत.