AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियात होणार दोन बदल, केएल राहुल आणि मोहम्मद सिराजची एन्ट्री

भारतीय संघ आशिया कप स्पर्धेसाठी युएईत दाखल झाला आहे. तर ऑस्ट्रेलिया ए संघ भारत दौऱ्यावर आला असून दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. यासाठी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात संघ जाहीर केला आहे. पण दुसऱ्या सामन्यात बदल केले जाणार आहेत.

टीम इंडियात होणार दोन बदल, केएल राहुल आणि मोहम्मद सिराजची एन्ट्री
टीम इंडियात होणार दोन बदल, केएल राहुल आणि मोहम्मद सिराजची होणार एन्ट्रीImage Credit source: PTI
| Updated on: Sep 06, 2025 | 5:18 PM
Share

ऑस्ट्रेलिया ए संघ भारत दौऱ्यावर येणार असून ही मालिका देखील तितकीच महत्त्वाची आहे. कारण या मालिकेतून पुढच्या संघाची निवड करणं सोप जाणार आहे. 16 सप्टेंबरपासून भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए संघात दोन अनौपचारिक कसोटी सामने खेळले जाणार आहेत. यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ या मालिकेत उतरणार आहे. पहिला सामना पार पडल्यानंतर दुसऱ्या सामन्यात दोन बदल केले जाणार आहे. या सामन्यासाठी केएल राहुल आणि मोहम्मद सिराज यांची संघात एन्ट्री होणार आहे. त्यामुळे दोन खेळाडूंना बसावं लागणार आहे. ही कसोटी मालिका वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंचं कमबॅक खूप काही सांगून जात आहे. दोन्ही खेळाडू इंग्लंड दौऱ्यात खेळले होते. ही मालिका 4 ऑगस्टला संपली असून तेव्हापासून ब्रेकवर आहेत.

दुसरा कसोटी सामना 23 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. हा सामना लखनौमध्ये होणार आहे. त्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 2 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे ही अनौपचारिक कसोटी मालिका केएल राहुल आणि मोहम्मद सिराजसठी महत्त्वाची आहे. त्यामुळे या दोघांची वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत निवड जवळपास पक्की मानली जात आहे. दुसरीकडे, आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर कसोटी कर्णधार शुबमन गिल मोकळा होणार आहे. त्याच्याकडे फक्त तीन दिवसांचा ब्रेक असेल.

दुसरीकडे, श्रेयस अय्यरची निवड वेस्ट इंडिजविरुद्धच्या संघात केली जाण्याची शक्यता आहे. कारण कर्णधारपद सोपवलं आहे, तसेच तिसऱ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर योग्य उमेदवार ठरू शकतो. कारण करुण नायर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत काही खास करू शकला नव्हता. त्यामुळे त्याच्या जागी संघात स्थान मिळू शकते. तर ध्रुव जुरेलच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची धुरा सोपण्यात आली आहे. या संघात ऋषभ पंत नाही. त्यामुळे तो आणखी दिवस भारतीय क्रिकेट संघापासून दूर असेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याचं खेळणं कठीण आहे. त्यामुळे त्याची जागा ध्रुव जुरेल घेऊ शकतो.

प्रफुल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होणार? स्वतः ट्वीट करत दिली माहिती
प्रफुल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होणार? स्वतः ट्वीट करत दिली माहिती.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीसांचे मोठे विधान
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीसांचे मोठे विधान.
राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान
राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान.
द्राक्ष उत्पादकांच्या डोळ्यात पाणी, उत्पादनात मोठी घट
द्राक्ष उत्पादकांच्या डोळ्यात पाणी, उत्पादनात मोठी घट.
अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू
अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू.
विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा अर्थसंकल्प;फडणवीस यांची प्रतिक्रिया
विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा अर्थसंकल्प;फडणवीस यांची प्रतिक्रिया.
भारतात डेटा सेंटर तयार करणाऱ्याऱ्यांना आर्थिक सूट
भारतात डेटा सेंटर तयार करणाऱ्याऱ्यांना आर्थिक सूट.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यपदी प्रफुल्ल पटेल?चर्चेवर काय केलं ट्विट
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यपदी प्रफुल्ल पटेल?चर्चेवर काय केलं ट्विट.
Budget 2026 Highlights : काय स्वस्त, काय महाग झालं? जाणून घ्या
Budget 2026 Highlights : काय स्वस्त, काय महाग झालं? जाणून घ्या.
7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा! मुंबई-पुणे मार्गाचाही समावेश
7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा! मुंबई-पुणे मार्गाचाही समावेश.