AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुलदीप यादवने पाच गडी टीपल्यानंतर सूर्यकुमार यादवला आठवला चहल इफेक्ट! कॅमेऱ्यासमोरच थेट विचारलं…

दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील टी20 मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली. पहिला सामना पावसामुळे वाया गेला, तर दुसरा सामना दक्षिण अफ्रिकेने जिंकत मालिकेत आघाडी घेतली होती. पण तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव जोडीने दक्षिण अफ्रिकेला बॅकफूटवर ढकललं.

कुलदीप यादवने पाच गडी टीपल्यानंतर सूर्यकुमार यादवला आठवला चहल इफेक्ट! कॅमेऱ्यासमोरच थेट विचारलं...
पाच विकेट्सचा चहलशी काय संबंध? सूर्यकुमार यादवच्या प्रश्नावर कुलदीप यादवने दिलं असं उत्तर
| Updated on: Dec 15, 2023 | 6:58 PM
Share

मुंबई : दक्षिण अफ्रिकेविरुद्धची टी20 मालिका बरोबरीत रोखण्यात टीम इंडियाला यश आलं. तीन सामन्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत मालिका बरोबरीत सोडवली. या सामन्यात सूर्यकुमार यादवची बॅट चांगलीच तळपली. दुसरीकडे, कुलदीप यादवने पाच गडी बाद करत दक्षिण अफ्रिकेला बॅकफूटवर ढकललं. सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी सूर्यकुमार यादवने त्याला बरेच प्रश्न विचारले. कुलदीप यादवने पाच गडी बाद केल्यानंतर सूर्यकुमार यादवने थेट कुलदीपला यादवला प्रश्न विचारला. “हा कुठे युजवेंद्र चहलचा इफेक्ट तर नाही ना? युजवेंद्र चहल वनडे मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेत आला आहे. तू त्या भेटला आणि लगेच पाच गडी बाद केले. तुमचं दोघांचं काही वेगळं कनेक्शन वाटत आहे.” असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

“चहल लांबचा प्रवास करून दक्षिण अफ्रिकेत आला आहे. म्हणून मी त्याला संध्याकाळी भेटलो. जास्त काही बोलणं झालं नाही. तो म्हणाला गोलंदाजी चांगली होत आहे. जास्त काही करण्याची गरज नाही. जास्त विचार करण्याची गरज नाही. त्याचा कायमच मला सपोर्ट राहिला आहे.काही वर खाली झालं तर तो सांगत असतो. कालही त्याला भेटलो तेव्हा त्याने तसंच सांगितलं.वनडेत एकत्र खेळण्याची संधी मिळाली तर नक्कीच आवडेल.”, असंही कुलदीप यादव म्हणाला.

तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाने 7 गडी गमवून 201 धावा केल्या आणि विजयसाठी 202 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान गाठताना दक्षिण अफ्रिकेचा संपूर्ण संघ 95 धावांवर बाद झाला. या सामन्यात कुलदीप यादवने 2.5 षटकात 17 धावा देत 5 गडी बाद केले. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कुलदीप यादवचा हा सर्वोत्तम स्पेल होता. कुलदीप यादवने 34 टी20 सामन्यात 58 गडी बाद केले. एका सामन्यात 17 धावा देत 5 गडी बाद करणं हा सर्वोत्तम कामगिरी आहे. कुलदीप यादवने 101 वनडे सामन्यात 167 गडी बाद केले आहेत. यात 25 धावा देत 6 गडी बाद करणं ही सर्वोत्तम खेळी आहे.

Follow Us
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर