AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: ‘ऐक, आम्हाला तुझ्याकडून…’ पंतला सलामीला पाठवण्याच्या प्रयोगावर गावस्कर म्हणतात….

वेस्ट इंडिज विरुद्धच्या (India vs west indies) तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात ऋषभ पंत (Rishabh pant) चौथ्या तर आज दुसऱ्या सामन्यात सलामीवीर म्हणून फलंदाजीला आला. के

IND vs WI: 'ऐक, आम्हाला तुझ्याकडून...' पंतला सलामीला पाठवण्याच्या प्रयोगावर गावस्कर म्हणतात....
gavaskar-Rishabh (BCCI)
| Updated on: Feb 09, 2022 | 7:17 PM
Share

अहमदाबाद: वेस्ट इंडिज विरुद्धच्या (India vs west indies) तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात ऋषभ पंत (Rishabh pant) चौथ्या तर आज दुसऱ्या सामन्यात सलामीवीर म्हणून फलंदाजीला आला. केएल राहुल संघात परतला असला, तरी त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. रोहित शर्मा आणि ऋषभ पंतने आज डावाची सुरुवात केली. अनेकांना या चालीने धक्का बसला. यामध्ये कॉमेट्री बॉक्समधून कॉंमेंट्री करणारे सुनील गावस्करही (Sunil gavaskar) होते. राहुलने मधल्याफळीत नेहमीच चांगली फलंदाजी केली आहे. आकडेच त्याबद्दल सर्वकाही सांगून जातात. त्यामुळे त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय घेतला असावा. ऋषभ पंतला सलामीला पाठवण्याच्या निर्णयावर गावस्कर म्हणाले की, “पहिल्या पावरप्लेमध्ये झटपट आणि जास्तीत जास्त धावा बनवण्याचा उद्देश असू शकतो. पुढच्यावर्षी 2023 मध्ये होणारी वर्ल्डकप स्पर्धा लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असावा”

म्हणून घेतला असावा निर्णय “पंतला सलामीला पाठवण्याच्या निर्णयामागे पहिल्या 10 षटकांचा विचार केला असावा. पहिल्या 10 ओव्हर्समध्ये कधीकधी भारताकडून अपेक्षित धावा होत नाहीत. त्यामुळे ऋषभ पंत फिल्डिंगवर असलेल्या मर्यांदाचा फायदा उचलेल, असे त्यांना वाटत असावे. हा एक प्रयोग होता. ही चाल यशस्वी ठरली, तर पुढच्या वर्ल्डकपमध्येही हेच चित्र दिसू शकतं” असं गावस्कर म्हणाले.

मग फिनिशर कोण? पंतला सलामीला आला, तर फिनिशरची जागा रिकाम रहाते, याकडे गावस्करांनी लक्ष वेधलं. हार्दिक पंड्या पूनर्वसनाच्या प्रक्रियेमध्ये आहे. रवींद्र जाडेजा अजूनही खांद्याच्या दुखापतीमधून सावरलेला नाही. गावस्करांच्या मते पंतला सलामीला आणण्यामागे त्याला जबाबदारीची जाणीव करुन देण्याचा देखील उद्देश असू शकतो. जबाबदारीचं भान देण्याचा देखील उद्देश असू शकतो “फिनिशर कोण ? हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. मला असं वाटत होतं की, ते पंतकडे फिनिशर म्हणून पाहत असतील. जो प्रत्येक चेंडू मारण्याचा प्रयत्न करतो. सलामीला पाठवून त्याला जबाबदारीची जाणीव करुन देण्याचा देखील उद्देश असू शकतो. पहिलाच चेंडू मारण्याच्या प्रयत्नात त्याला बाद होताना आपण पाहिलय. त्यामुळे वरती पाठवून जबाबदारीचं भान देण्याचा देखील उद्देश असू शकतो. ऐक आम्हाला तुझ्याकडून धावांची अपेक्षा आहे” असे गावस्कर म्हणाले.

Listen we expect runs from you Gavaskar on India’s Pant experiment

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली