AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs RCB : हार्दिक विजयानंतर रोहित शर्मा याच्याबाबत काय म्हणाला?

Hardik Pandya On Rohit sharma : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबईला सलग 3 पराभवानंतर सलग 2 सामन्यात विजय मिळाला. मुंबईने दिल्लीनंतर आरसीबीचा धुव्वा उडवला. आरसीबी विरुद्धच्या विजयानंतर कॅप्टन हार्दिक पंड्या रोहित शर्माबाबत काय म्हणाला?

MI vs RCB : हार्दिक विजयानंतर रोहित शर्मा याच्याबाबत काय म्हणाला?
Hardik Pandya On Rohit sharma,
| Updated on: Apr 12, 2024 | 8:50 PM
Share

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमात सलग दुसरा विजय मिळवला. मुंबईने वानखेडे स्टेडियममध्ये सलग दुसरा विजय साजरा केला. मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध 7 विकेट्सने मात केली. आरसीबीने मुंबईला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 27 बॉलआधी 15.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मुंबईच्या विजयानंतर कॅप्टन हार्दिक पंड्या याने आनंद व्यक्त केला. तसेच रोहित शर्मा याच्याबाबत प्रतिक्रिया दिली. हार्दिक रोहितबाबत काय म्हणाला? जाणून घेऊयात.

रोहित-ईशानकडून विजयाचा पाया

रोहित शर्मा आणि ईशान किशन या सलामी जोडीने मुंबईच्या विजयाचा पाया रचला. या दोघांनी शतकी सलामी भागीदारी केली. ईशान किशन याने 34 बॉलमध्ये 69 धावांची खेळी केली. तर रोहित शर्मा याने 24 बॉल्समध्ये 38 रन्स ठोकल्या. या दोघांव्यतिरिक्त सूर्यकुमार यादव याने विध्वंसक खेळी केली. सूर्याने 19 बॉलमध्ये 52 धावा चोपल्या. तिलक वर्मा याने 10 बॉलमध्ये नॉट आऊट 16 रन्स केल्या. तर कॅप्टन हार्दिक पंड्या याने विनिंग शॉट मारला. हार्दिकने 6 बॉलमध्ये नाबाद 21 रन्स ठोकल्या. हार्दिकने विजयानंतर आनंद व्यक्त करताना काय म्हणाला जाणून घेऊयात.

हार्दिक काय म्हणाला?

“जिंकण कायम चांगलं असतं. आम्ही ज्या पद्धतीने विजय मिळवला, ते फार प्रभावशाली होतं. इमपॅक्ट प्लेअर या पद्धतीमुळे आम्हाा गरजेच्या क्षणी अतिरिक्त बॉलर खेळवण्याची संधी मिळाली. ज्या पद्धतीने रोहित आणि इशानने बॅटिंग केली, त्यामुळे आमच्यासाठी व्यासपीठ तयार केलं. आमच्यासाठी सामना लवकर संपवणं आवश्यक होते. आम्ही याबाबत काहीच बोललो नाही, हे टीमचं वैशिष्टय आहे. खेळाडूंना परिस्थिती काय आहे हे माहित आहे. विजयी आव्हान कमी असल्याचं पाहिलं तेव्हा नेट रनरेट सुधारण्यासाठी सामना लवकर संपवण्याचा विचार केला”, असं हार्दिक म्हणाला. तसेच पंड्याने बुमराहचंही कौतुक केलं.

जसप्रीत बुमराह आमच्या टीममध्ये आहे हे आमचं भाग्य आहे, असंही पंड्याने म्हटलं. बुमराहने मुंबईकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या. बुमराहने विकेट्सचा पंजा उघडला. बुमराहची आयपीएलमध्ये 5 विकेट्स घेण्याची ही दुसरी वेळ ठरली.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी आणि आकाश मधवाल.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार वैशाख, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!