India vs South Africa: संजू सॅमसनला प्लेइंग 11 मधून डावलणं पडू शकतं महागात, कारण की…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारताचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होत आहे. या सामन्यात प्लेइंग 11 काय असेल? याबाबत चर्चा रंगली आहे. असं असताना संजू सॅमसनला संधी देण्याची मागणी होत आहे. त्याला कारणही तसंच आहे.

India vs South Africa: संजू सॅमसनला प्लेइंग 11 मधून डावलणं पडू शकतं महागात, कारण की...
संजू सॅमसनला प्लेइंग 11 मधून डावलणं पडू शकतं महागात, कारण की...
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 22, 2026 | 5:36 PM

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात गट 1 मधील सुपर 8 फेरीचा पहिला सामना होत आहे. या सामन्यातील विजय दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. कारण उपांत्य फेरी गाठायची असेल तर सुपर 8 फेरीत विजयी सुरूवात करणं गरजेचं आहे. नाही तर गणित जर तरवर येऊ शकते. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेविरुद्ध प्लेइंग 11 निवडताना काळजी घेण्याची गरज आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यापूर्वी भारताची माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने टीम इंडियाला इशारा दिला आहे. इतकंच काय तर संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये खेळवण्याची मागणी केली आहे. त्या मागचं कारणही त्याने सांगितलं आहे. मोहम्मद कैफने सांगितलं की, टीम इंडियाची फलंदाजी कमकुवत दिसत आहे. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला होऊ शकतो. संजू सॅमसन प्लेइंग 11चा भाग असेल तर नक्कीच टीम इंडियाला फायदा होईल. चला जाणून घेऊयात मोहम्मद कैफचं म्हणणं तरी काय?

मोहम्मद कैफने सोशल मीडियावर संजू सॅमसनची बाजू घेणारी पोस्ट केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, टीम इंडियात खूप सारे डावखुरे फलंदाज आहेत. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला होऊ शकतो. कैफने लिहिलं की, ‘भारताचे टॉप ऑर्डरमध्ये खूप जास्त डावखुरे आहेत. त्यामुळे विरोधी संघाला प्लान आखणं सोपं जाईल. ते ऑफ स्पिनर्स त्यांच्या विरुद्ध आणू शकतात. सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये स्थान देऊन गोष्टी बदलू शकतो.’ खरं तर अभिषेक शर्माचा फॉर्म पाहून संजू सॅमसनला स्थान देण्याची मागणी होत आहे. कारण त्याने मागच्या तीन सामन्यात एकही धाव केलेली नाही. पण कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर याचा त्याच्यावर विश्वास आहे. त्यामुळे प्लेइंग 11 मधून वगळयाचं तर कोणाला? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

संजू सॅमसन आत तर बाहेर कोण?

संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये संधी देण्याची चर्चा सुरू आहे. पण त्याच्यासाठी कोणाला संघातून बाहेर जावं लागेल हे मात्र सांगणं कठीण आहे. असं असताना तिलक वर्माच्या नावाची चर्चा होत आहे. कारण टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याचा स्ट्राईक रेट चिंतेचा विषय आहे. त्याने चार सामन्यात 106 धावा केल्या आहे. यावेळी त्याचा बॅटिंग एव्हरेज 26.5चा आहे. तर स्ट्राईक रेट हा 120 चा आहे. त्याच्या तुलनेत हा स्ट्राईक रेट खूपच कमी आहे. दुसरीकडे, संजू सॅमसनला फक्त एकाच सामन्यात संधी मिळाली आहे. त्याने 22 धावा केल्या. पण त्याचा स्ट्राईक रेट हा 275चा होता.