AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya | रोहितची कॅप्टन्सी काढल्यावर सूर्यकुमार सोडणार मुंबई इंडियन्सची साथ?, सूर्याच्या ट्विटमुळे खळबळ!

Suryakumar viral post on social media : रोहित शर्मा याच्या जागी मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पंड्याला कर्णधार गेल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आता या वादात टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि मुंबईचा स्टार बॅट्समन हार्दिकने केलेलं ट्विट व्हायरल होत आहे.

Hardik Pandya | रोहितची कॅप्टन्सी काढल्यावर सूर्यकुमार सोडणार मुंबई इंडियन्सची साथ?, सूर्याच्या ट्विटमुळे खळबळ!
rohit sharma suryakumar yadav post after hardik captain
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 16, 2023 | 5:27 PM
Share

मुंबई : आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पंड्या याला कर्णधार केल्याचं जाहीर केलं. रोहित शर्मा आता मुंबईचा कॅप्टन राहिला नाही. गुजरात संघाकडून त्याला ट्रेडिंगध्ये माघारी घेत थेट कर्णधारपदाची धुरा सांभाळायला दिली आहे. रोहितला हटवल्यामुळे चाहतेही संतप्त झाले आहेत. कारण एक-दोन नाहीतर संघाला पाच ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रोहितला अशा प्रकारे कर्णधारपदावरून हटवल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या निर्णयामुळे चाहतेच नाहीतर स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवसुद्धा नाराज झालेला दिसत आहे. सूर्यकुमार यादव याच्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

सूर्यकुमार यादव याने आपल्या इन्स्टा स्टोरीवर आणि (एक्सवर) म्हणजे ट्विटवर एक हार्टब्रोक झालेला इमोजी टाकला आहे. त्यामुळे चाहत्यांचं म्हणणं आहे की, सूर्यालाही हार्दिकला कप्तान केल्यााचं आवडलं नाही. तर काही चाहते बोलत आहेत की, सूर्या रोहितनंतर कर्णधार होता मात्र त्याचा पत्ता हार्दिकमुळे कट झाला. सूर्यानेही आता मुंबईचा संघ सोडायला हवा. रोहितला कर्णधार म्हणून हटवल्यावर मुंबईच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सवर जोरदार टीका केली आहे.

सूर्याची पोस्ट

रोहितला कॅप्टन पदावरून काढल्याने सूर्यालाही दु:ख झाल्याचं दिसत आहे. मुंबईच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मुंबई इडियन्सला अनफॉलो करत ट्विटरवर #ShameonMI हा ट्रेंड चालवला आहे. मुंबई इंडियन्सचे चार लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स कमी झाले आहेत.

दरम्यान, सूर्यकुमार यादव याच्याकडे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी तर आता पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तीन सामन्यांच्या टी- 20 मालिकेसाठी संघाचं कर्णधारपद देण्यात आलंं होतं. रोहित शर्मा याच्यानंतर सूर्यकुमार यादव याच्याकडे संघाची कॅप्टन्सी जाण्याची शक्यता होती. मात्र हार्दिक पंड्याला कर्णधार बनवल्याने त्यालासुद्धा वाईट वाटलं असू शकतं. रोहितची यावर अजुनही कोणतीच प्रतिक्रिया आली नाही.

Follow Us
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे...
Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच...
पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
Mumai Rain Update | पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?